मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून Video पोस्ट
मुंबई : आणीबाणी १९७५ (Emergency 1975) हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त आणि काळा अध्याय मानला जातो. स्वतंत्र भारताच्या इतिहासात २५ जून १९७५ च्या मध्यरात्री तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. यामुळे नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर (Fundamental Rights) निर्बंध आले आणि लोकशाही संस्थांवर मोठा परिणाम झाला.
आज (२५ जून) आणीबाणीच्या ५१व्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर एक Video शेअर करत, "आणीबाणी १९७५... भारताच्या इतिहासातील काळा दिवस" असे म्हटले आहे. तसेच भाजपचे (BJP) अनेक नेते आणि पदाधिकारी देखील सोशल मीडिया पोस्ट्सद्वारे आणीबाणीची आठवण करून देत काँग्रेसवर टीका करत आहेत.
Emergency 1975, a dark day in independent India's history, when constitutional freedoms were suspended, and democratic rights were suppressed.
आणीबाणी 1975; स्वतंत्र भारताच्या इतिहासात लोकशाहीचे घटनात्मक अधिकार गोठवून, भारतीयांची गळचेपी करणारा काळा दिवस!#आणीबाणी… pic.twitter.com/rM8peeiEs9
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 25, 2026
आणीबाणीची सुरुवात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या (Allahabad High Court) एका ऐतिहासिक निर्णयामुळे झाली होती. रायबरेली लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले समाजवादी नेते राज नारायण यांनी इंदिरा गांधी यांच्या विरोधात निवडणूक गैरप्रकारांची याचिका दाखल केली होती. त्यांनी आरोप केला होता की, इंदिरा गांधी यांनी सरकारी अधिकारी यशपाल कपूर आणि इतर शासकीय यंत्रणेचा निवडणूक प्रचारासाठी वापर केला.
लोणावळा : चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या (Ketan Agarwal Murder Case) तपासाला आता अधिक वेग आला आहे. या प्रकरणाचा तपास अत्यंत गांभीर्याने सुरू असून ...
काँग्रेस सरकारविरोधात वाढला असंतोष
लेखक ज्ञान प्रकाश यांच्या "Emergency Chronicles: Indira Gandhi and Democracy's Turning Point" या पुस्तकात आणीबाणीचा उल्लेख भारतीय लोकशाहीवरील कलंक (Blot on Democracy) असा करण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १२ जून १९७५ रोजी इंदिरा गांधी यांना निवडणूक गैरव्यवहारासाठी दोषी ठरवले. या निर्णयानंतर काँग्रेस सरकारविरोधात जनतेतील असंतोष अधिक तीव्र झाला.
त्या काळात वाढती महागाई (Inflation), जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा (Shortage of Essentials) आणि अस्थिर अर्थव्यवस्था (Economic Instability) यामुळे जनतेमध्ये नाराजी होती. गुजरातमधील नवनिर्माण आंदोलन (Navnirman Movement) आणि बिहारमधील जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी आंदोलनाला देखील वेग आला होता.
इंदिरा गांधी यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) अपील केले. २४ जून १९७५ रोजी न्यायालयाने त्यांना सशर्त दिलासा (Conditional Relief) दिला, मात्र संसदेतील मतदानाचा अधिकार काढून घेतला.
व्हेनेझुएला (Venezuela) आणि जपान (Japan) या दोन देशांना बुधवारी (२४ जून) शक्तिशाली भूकंपांचे (Earthquake) धक्के बसले. व्हेनेझुएलामध्ये अवघ्या एका मिनिटाच्या अंतराने ७.२ ...
रामलीला मैदानावरील ऐतिहासिक रॅली
२५ जून १९७५ रोजी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर (Ramlila Maidan) भव्य रॅली आयोजित केली. या सभेत लोकनायक जयप्रकाश नारायण यांनी पोलिस आणि सरकारी कर्मचाऱ्यांना अन्यायकारक आदेशांचे पालन न करण्याचे आवाहन केले.
प्रेसवर सेन्सॉरशिप आणि विरोधकांची अटक
आणीबाणी लागू झाल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Expression) आणि इतर मूलभूत अधिकारांवर निर्बंध घालण्यात आले. प्रसारमाध्यमांवर (Media) सेन्सॉरशिप (Censorship) लागू करण्यात आली. जयप्रकाश नारायण, अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह अनेक विरोधी पक्ष नेत्यांना अटक करण्यात आली.
संजय गांधींचे नसबंदी अभियान
आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांच्या नेतृत्वाखाली लोकसंख्या नियंत्रणाच्या नावाखाली नसबंदी मोहीम (Sterilization Drive) राबविण्यात आली. या मोहिमेत लाखो गरीब पुरुषांची जबरदस्तीने नसबंदी केल्याचे आरोप झाले.
आणीबाणीचा शेवट
१८ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधी यांनी लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आणि राजकीय कैद्यांच्या सुटकेचे आदेश दिले. त्यानंतर २१ मार्च १९७७ रोजी आणीबाणी अधिकृतरित्या संपुष्टात आली.
Kalyan: कल्याणमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अवघ्या ७ वर्षांच्या चिमुरडीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात ...
शालेय अभ्यासक्रमात उशिराने समावेश
आणीबाणीचा विषय अनेक दशकांनंतर एनसीईआरटी (NCERT) च्या राज्यशास्त्राच्या पुस्तकात समाविष्ट करण्यात आला. मात्र कोविड-१९ नंतर अभ्यासक्रम कमी करताना हा धडा काही ठिकाणी वगळण्यात आला.
आणीबाणीचा घटनाक्रम (Timeline)
- जानेवारी १९६६ : इंदिरा गांधी पंतप्रधान बनल्या.
- १९७१ : राज नारायण यांनी रायबरेली निवडणुकीविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली.
- १२ जून १९७५ : अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींना दोषी ठरवले.
- २४ जून १९७५ : सर्वोच्च न्यायालयाने सशर्त दिलासा दिला.
- २५ जून १९७५ : देशात आणीबाणी लागू करण्यात आली.
- १८ जानेवारी १९७७ : निवडणुका जाहीर, राजकीय कैद्यांच्या सुटकेचे आदेश.
- १६ मार्च १९७७ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का.
- २१ मार्च १९७७ : आणीबाणी अधिकृतरित्या समाप्त.