LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग


नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला मोठा फटका दिल्यानंतर सीमारेषेवरील (LOC News) घडामोडींना वेग आला आहे. पाकिस्तानकडून सातत्याने युद्धजन्य भाषा वापरली जात असताना आता नियंत्रण रेषेवर (LoC) मोठ्या प्रमाणात सैन्य आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची तैनाती करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (LOC News)


सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराच्या आठ ब्रिगेडनी एलओसी परिसरात ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात केली आहेत. लेझर तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या युनिट्सचे मुख्य उद्दिष्ट संभाव्य हवाई हल्ले आणि ड्रोन घुसखोरी रोखणे हे आहे. याशिवाय पाकिस्तानने सीमावर्ती भागात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित फेन्सिंग उभारून निगराणी आणि लक्ष्य शोधण्याची क्षमता वाढवली आहे. (LOC News)


पाकिस्तानने इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि काउंटर-ड्रोन ग्रिडही विकसित केल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, अफगाणिस्तान सीमेवर तैनात असलेल्या पाच बटालियन या महिन्याच्या सुरुवातीला हटवून त्यांना एलओसीलगतच्या रावलाकोट आणि कोटली भागात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडून सीमावर्ती भागात लष्करी हालचाली वाढल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. (LOC News)



ऑपरेशन सिंदूरचा फटका अद्याप कायम :


भारतीय लष्कराच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानच्या अनेक महत्त्वाच्या हवाई तळांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. नूर खान, मुरीद, भोलारी, सरगोधा, जेकोबाबाद, सुक्कुर आणि रहीमयार खान यांसारख्या एअरबेसवरील इंधन साठे आणि रडार यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त होते. या नुकसानीची भरपाई करण्यासाठी पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. (LOC News)


याशिवाय पाकिस्तान वायुदल बलुचिस्तानमधील नसीराबाद जिल्ह्यातील नोताल आणि खैबर पख्तूनख्वातील मानसेहरा येथे नवीन हवाई तळ उभारण्याच्या योजनेवर काम करत आहे. त्यामुळे भविष्यातील संरक्षण क्षमता मजबूत करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. (LOC News)



तुर्कस्तान आणि चीनची मदत :


दरम्यान, पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रात तुर्कस्तान आणि चीनकडूनही मोठी मदत मिळत आहे. कराचीजवळ तुर्कस्तानच्या सहकार्याने कॉम्बॅट ड्रोन असेंबली प्लांट उभारण्यात आला असून, येथून दरवर्षी सुमारे ७०० ड्रोन तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या ड्रोनच्या निर्यातीसाठी पाकिस्तानने बांगलादेशासोबत सामंजस्य करार (MoU) केल्याचीही माहिती आहे. (LOC News)



तुर्कस्तानकडून पाकिस्तानसाठी मिलजेम श्रेणीतील अत्याधुनिक पाणबुडीची निर्मिती सुरू असून ती यावर्षाअखेरीस पाकिस्तानला मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे चीननेही पाकिस्तानला मल्टी-रोल जे-सीरिजच्या ३६ लढाऊ विमानांचा पुरवठा केल्याचे वृत्त आहे. तसेच भविष्यात अमेरिकेच्या एफ-३५ च्या धर्तीवर विकसित करण्यात आलेले चिनी जे-३५ फायटर जेटही पाकिस्तानच्या ताफ्यात दाखल होऊ शकते. दक्षिण आशियातील कोणत्याही देशाकडे सध्या पाचव्या पिढीचे लढाऊ विमान नसल्याने या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. (LOC News)


सीमेवरील वाढत्या हालचाली आणि संरक्षण क्षमतेत होत असलेल्या बदलांमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.

Comments
Add Comment

COVID-19 Variant : आंध्र प्रदेशमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार सक्रीय झाल्याची शक्यता, दोन मृत्यूंनी खळबळ

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशमध्ये कोरोनाची लागण झाल्याने दोन रूग्णांचा मृत्यू झाला आहे. २०२२ नंतर पहिल्यांदाच

Madhya Pradesh : धार येथील भोजशाळा वाग्देवी मंदिरच, हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

मुस्लिमांसाठी पर्यायी नमाजस्थळाची व्यवस्था करण्याचे निर्देश नवी दिल्ली : मध्यप्रदेशच्या धार येथील ऐतिहासिक

Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ला; लष्कर-ए-तोयबा प्रमुख हाफिज सईदविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी

जम्मू : पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सुरू असलेल्या तपासाच्या संदर्भात, एका विशेष एनआयए न्यायालयाने

Hormuz Strait Attack : होर्मुझ हल्ल्यात भारतीय नाविकाच्या मृत्यूनंतर भारताने इराणी दूतावासाला बजावले समन्स

नवी दिल्ली : इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीत संयुक्त अरब अमिरातीच्या (युएई) तेलवाहू जहाजांवर झालेल्या हल्ल्यात

Lalu Prasad Yadav : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांचा जामीन कायम, सीबीआयची याचिका फेटाळली

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने यांना मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळा प्रकरणात दोषी ठरल्यानंतर लालू प्रसाद

Dhar Bhojshala supreme court : धार भोजशाळा वाद : 'प्रकरण अत्यंत संवेदनशील', अंतिम निकाल येईपर्यंत नमाजसाठी पर्यायी जागेची व्यवस्था - सर्वोच्च न्यायालय

मध्य प्रदेशातील धार येथील वादग्रस्त भोजशाळा परिसराच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण अंतरिम