रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली. मंगळवारी रात्री झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन (JSCA) आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या बाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल ३५ प्रेक्षक जखमी झाले. अंतिम सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने क्रिकेटप्रेमींनी स्टेडियमकडे धाव घेतल्याने प्रवेशद्वारांवर प्रचंड गर्दी झाली आणि त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, अंतिम सामना पाहण्यासाठी दुपारपासूनच प्रेक्षक स्टेडियम परिसरात जमा होऊ लागले होते. सामना सुरू होण्यापूर्वीच हजारो चाहत्यांनी स्टेडियमबाहेर गर्दी केली होती. मात्र, सुरक्षा तपासणी आणि प्रवेश प्रक्रिया संथ गतीने सुरू असल्याने गेटबाहेर लांबच लांब रांगा लागल्या. प्रतीक्षा वाढत गेल्याने प्रेक्षकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आणि धक्काबुक्की सुरू झाली. काही वेळातच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. (Jharkhand T20 League)
पुणे: पुण्यातील केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसा पुढे सरकत आहे, तसे नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. केतनला लोहगड किल्ल्यावरून ढकलून त्याची ...
या घटनेत जखमी झालेल्या ३५ जणांपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारासाठी अनेकांना स्टेडियममधील मीडिया गॅलरीजवळ उपचार देण्यात आले. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. (Jharkhand T20 League)
बॅरिकेडिंग तोडून प्रेक्षकांचा प्रवेशाचा प्रयत्न :
प्रवेशासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागत असल्याने संतप्त झालेल्या काही प्रेक्षकांनी वेस्ट गेटवरील बॅरिकेडिंग तोडले. त्यानंतर स्टेडियम परिसरात एकच गोंधळ उडाला. वेस्ट गेटनंतर नॉर्थ गेट आणि एमएस धोनी पॅव्हेलियन परिसरातही प्रेक्षकांनी गर्दी करत गोंधळ घातल्याचे सांगितले जात आहे. काहींनी बंद गेट तोडण्याचाही प्रयत्न केला. अखेर गेट उघडताच हजारो लोक एकाचवेळी आत धावल्याने अनेक जण पडले आणि त्यांना दुखापती झाल्या. (Jharkhand T20 League)
आयोजकांच्या नियोजनावर टीका :
स्थानिक नागरिक आणि प्रेक्षकांनी या घटनेसाठी आयोजकांच्या अपुऱ्या नियोजनाला जबाबदार धरले आहे. अंतिम सामना पाहण्यासाठी सुमारे ३० हजारांहून अधिक प्रेक्षक येणार असल्याचा अंदाज असूनही पुरेशी सुरक्षा, गर्दी नियंत्रणाची यंत्रणा आणि प्रवेश व्यवस्थेची आखणी करण्यात अपयश आल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य वेळी गर्दीचे व्यवस्थापन केले असते तर ही दुर्घटना टाळता आली असती, अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी दिली. (Jharkhand T20 League)
मुंबई : आज म्हणजेच २४ जून बुधवारी भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील तीन तासांत मुंबई आणि पालघरमधील काही भागांमध्ये ...
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनुचित प्रकार टाळण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. या घटनेनंतर स्टेडियममधील सुरक्षा व्यवस्थेवर आणि आयोजकांच्या तयारीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. (Jharkhand T20 League)