BMC News : मुंबईतील सर्व नैसर्गिक तलाव, जलाशयांचे पुनरुज्जीवन करा

- यासाठी कृती आराखडा तयार करण्याचे आमदार अमित साटम यांची मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमीत साटम यांनी मुंबई महापालिकेने (BMC News) केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव (natural lakes) आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी महापौर आणि महापालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे. (BMC News)



मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) आणि महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना भाजपचे मुंबई अध्यक्ष व आमदार यांनी पत्र पाठवून ही मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी असे म्हटले आहे की, एल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनला झालेला विलंब हा शहरातील पाणी टंचाईस कारणीभूत ठरत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पावसावर १०० टक्के अवलंबून राहणे दिवसेंदिवस अधिक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी जलस्रोतांचा गांभीर्याने विचार करण्याची हीच योग्य वेळ आहे, असे साटम यांनी म्हटले आहे. (BMC News)



शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी महापालिकेने कृती आराखडा तयार करावा, तसेच त्या ठिकाणी आरओ प्रकल्प उभारून पाणी वापरयोग्य बनवावे, अशी मागणीही साटम यांनी केली आहे. यानंतर परिसरातील भागांना पाणीपुरवठा करण्यासाठी स्वतंत्र वितरण यंत्रणा उभारता येईल. भविष्यातील वाढत्या गरजा लक्षात घेऊन क्षारनिर्मूलन (डिसॅलिनेशन) प्रकल्पाची क्षमता १००० एमएलडीपर्यंत वाढविणे आवश्यक आहे. यासाठीचे काम कोणताही विलंब न करता तातडीने सुरू करावे, असेही त्यांनी नमूद केले आहे. (BMC News)

Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामजंस्य करार करणार

मुंबई : राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी

Prakash Abitkar : गावापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत ‘मानकांनुसार आरोग्यसेवा’

मुंबई : राज्यातील नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार, सुलभ आणि वेळेत आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी

Rain In Maharashtra : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा फॉर्मात येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये जोरात बरसणार ?

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पावसाने पुन्हा एकदा महाराष्ट्राकडे मोर्चा वळवल्याचे चित्र आहे.

Ashish Shelar : गणेशमूर्ती आगमन मार्गांची २४ तासांत पाहणी; प्रशासकीय कसूर आढळल्यास कारवाई - आशिष शेलार

मुंबई : भुलेश्वरचा राजा गणेश मंडळाच्या गणेशमूर्ती आगमन सोहळ्यात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील

Weather Update : महाराष्ट्रात सोमवारी कोण कोणत्या भागात पावसाची शक्यता ?

मुंबई : हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवार २४ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे.

Indian Railway : भारतीय रेल्वेचा नवा विक्रम; पहिल्या डबल-स्टॅक लाँग-हॉल कंटेनर ट्रेनची यशस्वी धाव

मुंबई : भारतीय रेल्वेने मालवाहतुकीच्या क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) येथून