BMC News : पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी मुंबईत ५४७ पंप

- दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपयांचा केला जाणार खर्च


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्याचे प्रकार घडत असून या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुढील दोन वर्षांकरता पंप बसवण्यात येणार आहे. . पुढील दोन वर्षांसाठी तब्बल १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. मागील वर्षी ४८१ पंप बसवण्यात आले होते, तर यंदा हे आता ५४७ पंप बसवले जाणार आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ६६ पंपांची वाढ झाली आहे. (BMC News)


मुंबईच्या भौगोलिक रचनेमुळे, पावसाचे पाणी सखल भागात जमा होते व त्याचा निचरा होत नाही. अशा साचलेल्या पावसाळी पाण्यामुळे जवळपासच्या वस्तीमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते व त्याचा वहानांच्या रहदारीवर तसेच जनजीवनावर परिणाम होतो, म्हणुन मुंबई महानगरपालिका अशा सखल भागातील पाण्याचा निचरा लवकर होण्यासाठी मागील १६ वर्षांपासून पाण्याचा उपसा करणारे पपं बसवण्याची व्यवस्था करीत आहे. मुसळधार पावसात साचलेले पाणी या पंपांद्वारे जवळपासच्या नाल्यात, मलनिःसारण वाहिन्यांमध्ये तसेच पर्जन्य जल वाहिनीत सोडले जाते. (BMC News)



मुंबई महानगरपालिकेच्या २४ प्रभागांमध्ये आणि राजे एडवर्ड व लोकमान्य टिळक ही दोन मोठी रुग्णालये आदी परिसरांमध्ये हे पंप बसवले जाणार आहेत..


सन २०२५मध्ये विविध ठिकाणी ४८१ पंप भाडेतत्वावर घेण्यात आले होते. त्यानंतर आता सन २०२६ व सन २०२७ या कालावधीसाठी ५४७ पंप बसवण्यात येणार आहे. या दोन वर्षांसाठी सुमारे १४२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. (BMC News)



महापालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार. महापालिका प्रशासनाच्यावतीनउदंचन संचाच्या कार्यावर प्रभावीपणे देखरेख ठेवण्याकरीता तसेच पारदर्शकता प्राप्त करण्याकरीता प्रत्येक उदंचन संचावर आय. ओ.टी उपकरण बसविण्यात येणार आहे. या पंपांचीचालु व बंद माहिती आय.ओ.टी उपकरणाद्वारे थेट मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पी.एम.एस. या प्रणालीवर पाठविण्यात येईल. तसेच प्रत्येक पंपांवर बसविलेल्या ठिकाणी नेमून दिलेल्या कामगार वर्गाच्या भ्रमणध्वनीला भू-कुंपण केले जाईल. अशाप्रकारे भ्रमणध्वनींचे भू-कुंपण केल्यामुळे तेथे कार्यरत असलेल्या कर्मचा-यांचा उपस्थिती अहवाल थेट एका ऍपद्वारे प्राप्त होणार आहे. अशाप्रकारे आय.ओ.टी उपकरण व भू-कुंपण यांचा वापर पंपांच्या कार्यावर देखरेख ठेवण्याकरीता प्रथमच मुंबई हानगरपालिकेद्वारे करण्यात येणार आहे. (BMC News)

Comments
Add Comment

Vinayak Raut : विनायक राऊत यांच्या सुनेच्या छळ प्रकरणात न्यायालयात धक्कादायक खुलासे

- संशयित बाबाच्या दर्ग्यातून लिंबू, टाचण्या, सुगंधी द्रव्ये जप्त; अघोरी कृत्यांचा पोलिसांचा दावा मुंबई : उबाठा

Devendra Fadnavis : २६/११ हल्ल्याबाबत आर. व्ही. एस. मणी यांचे दावे धक्कादायक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी मुंबई : मुंबईवर झालेल्या २६/११ च्या भीषण

Chandrashekhar Bawankule : दुबार पेरणीचा खर्च आता सरकार उचलणार

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती; 'डीपीडीसी'मधून खर्चाची तरतूद करणार मुंबई : पावसाने ओढ दिल्याने आणि

Ashish Shelar : दरवर्षी नाट्यगृहांच्या भाड्यात केवळ 1 ते 2 टक्के वाढ

• कोविडपूर्वीचाच मूळ दर आधारभूत मानणार • नाट्यसृष्टीच्या गोडाऊन व वाहनतळाच्या प्रश्नासाठी महिनाभरात

Navnath Ban : संजय राऊत, इतरांकडे पाहण्यापेक्षा अडगळीत पडलेल्या उबाठाकडे लक्ष द्या - नवनाथ बन

मुंबई : नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले "जनाब संजय राऊत

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी अत्याधुनिक संप्रेषण व्यवस्था उभारणीसाठी शासन सकारात्मक – मंत्री नितेश राणे

खोल समुद्रातील संपर्कासाठी मच्छिमारांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करण्यासाठी पुढाकार; बीएसएनएलसोबत समन्वय मुंबई, :