Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. तसेच धरण क्षेत्र व अन्य उद्भव क्षेत्रांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसा तात्काळ थांबविण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.



जिल्ह्यात १५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा


जिल्ह्यात सध्या १५१ टँकरद्वारे १६१ गावे आणि ८६७ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार मजूर घरकुलांच्या कामांवर कार्यरत असून, मागणीनुसार अधिक कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


जनावरांसाठी सध्या पुरेसा चारा उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष उपलब्धतेचा नव्याने सर्वेक्षण अहवाल पाच ते सहा दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील चारा बाहेर जाणार नाही याची दक्षता पशुसंवर्धन विभागाने घ्यावी तसेच कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी (Agriculture and Animal Husbandry Department) संयुक्तपणे तालुकानिहाय व गावनिहाय आढावा घेऊन नियोजन करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.



टँकरसाठी ज्या ठिकाणी पाणी भरले जाते तेथील वीजपुरवठा अखंडित ठेवण्याची जबाबदारी महावितरणने पार पाडावी. तसेच टँकरचे पाणी विहिरीत न टाकता तोटीयुक्त प्लास्टिकच्या टाक्यांमधून नागरिकांना वितरित करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल आणि सर्वांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.


टँकरच्या पाण्याचे नमुने नियमित तपासावेत, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री करावी, पाणीपुरवठा स्रोतांची सातत्याने तपासणी करावी आणि टँकरच्या पाणीवाटपासाठी निश्चित वेळापत्रक तयार करून त्यानुसारच वितरण करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Comments
Add Comment

Return of the Monsoon: सुस्तावलेला पाऊस पुन्हा सक्रीय, महाराष्ट्रासह मध्य भारतात पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: गेल्या दोन आठवड्यांपासून देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रगती मंदावली होती, ज्यामुळे पावसाची तूट

Parabharani : मंदिराचे सभामंडप कोसळले आणि होत्याचे नव्हते झाले... धक्कादायक घटनेचे इत्यंभूत वृत्त

परभरणी : मानवत तालुक्यातील यशवाडी परिसरात हनुमान मंदिर उभारण्याचे काम सुरू आहे. या मंदिराच्या सभामंडपाचे छत

Agriculture Minister Dattatray Bharne : राज्यातील ९० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळणार

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या २३ व्या हप्त्याचे वितरणः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे राज्यातील ९०.८५

Ahilyanagar : वारीच्या नियोजनासाठी दिंड्यांची माहिती २५ जूनपर्यंत द्या; पाणी बचतीचे मंत्री विखे पाटील यांचे आवाहन

Ahilyanagar : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर दिंड्या आणि वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक

Pavanraje Nimbalkar Murder Case : पद्मसिंह पाटलांसह सर्व आरोपी निर्दोष

पवनराजे हत्याकांडाचा २० वर्षांनंतर निकाल; माफीच्या साक्षीदाराची साक्ष विश्वासार्ह नसल्याचे न्यायालयाचे

Kolhapur Shri Mahalakshmi Temple : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी घेतले अंबाबाईचे दर्शन; मुख्यमंत्री आणि अमित शहांच्या उपस्थितीत १,४४५ कोटींच्या विकासकामांना सुरुवात

केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज