Ahilyanagar : धरणांतील पाणी ३० सप्टेंबरपर्यंत पिण्यासाठी राखीव; बेकायदा पाणीउपसा तात्काळ बंद करण्याचे आदेश

Ahilyanagar एल-निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. तसेच धरण क्षेत्र व अन्य उद्भव क्षेत्रांमधून होणारा अनधिकृत पाणीउपसा तात्काळ थांबविण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Minister Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिले.



जिल्ह्यात १५१ टँकरद्वारे पाणीपुरवठा


जिल्ह्यात सध्या १५१ टँकरद्वारे १६१ गावे आणि ८६७ वाड्या-वस्त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. रोजगार हमी योजनेअंतर्गत सुमारे २३ हजार मजूर घरकुलांच्या कामांवर कार्यरत असून, मागणीनुसार अधिक कामे उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


जनावरांसाठी सध्या पुरेसा चारा उपलब्ध असला तरी प्रत्यक्ष उपलब्धतेचा नव्याने सर्वेक्षण अहवाल पाच ते सहा दिवसांत प्राप्त होणार असून, त्यानुसार पुढील नियोजन केले जाईल. जिल्ह्यातील चारा बाहेर जाणार नाही याची दक्षता पशुसंवर्धन विभागाने घ्यावी तसेच कृषी आणि पशुसंवर्धन विभागांनी (Agriculture and Animal Husbandry Department) संयुक्तपणे तालुकानिहाय व गावनिहाय आढावा घेऊन नियोजन करावे, असे निर्देश विखे पाटील यांनी दिले.



टँकरसाठी ज्या ठिकाणी पाणी भरले जाते तेथील वीजपुरवठा अखंडित ठेवण्याची जबाबदारी महावितरणने पार पाडावी. तसेच टँकरचे पाणी विहिरीत न टाकता तोटीयुक्त प्लास्टिकच्या टाक्यांमधून नागरिकांना वितरित करावे, जेणेकरून पाण्याचा अपव्यय टळेल आणि सर्वांना समान प्रमाणात पाणी उपलब्ध होईल, असे त्यांनी सांगितले.


टँकरच्या पाण्याचे नमुने नियमित तपासावेत, नागरिकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी मिळेल याची खात्री करावी, पाणीपुरवठा स्रोतांची सातत्याने तपासणी करावी आणि टँकरच्या पाणीवाटपासाठी निश्चित वेळापत्रक तयार करून त्यानुसारच वितरण करावे, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

Comments
Add Comment

Ashish Shelar : लोककलांच्या धोरणाच्या बळकटीकरणासाठी समिती स्थापन करणार

सांस्कृतिक कार्यमंत्री अँड आशिष शेलार राज्याचे सांस्कृतिक धोरण तयार झाले आहे, त्यामध्ये लोककलांचा विचार

Nitesh Rane : राम मंदिरावरच आंदोलन मग कथित हज घोटाळ्यावर मौन का ? मंत्री राणे यांचा उबाठावर घणाघात

शिर्डी  : राम मंदिराच्या नावाने रान उठवणाऱ्यांची जीभ कथित हज घोटाळा किंवा इतर धार्मिक संस्थांतील कथित

Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपो दुर्घटनेची मोठी अपडेट : तब्बल ७६ तासांनंतर ढिगाऱ्याखाली ४ जण आढळले!

पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथील मोशी (Moshi) कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या भीषण दुर्घटनेला आता चार दिवस उलटून

Ketan-Siya Case : केतन-सिया प्रकरणात मोठा ट्विस्ट! या कारणामुळे सिया-चेतन निर्दोष सुटण्याची शक्यता ?

Mumbai : पुण्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरण सध्या देशभरात चर्चेचा विषय बनले आहे. १८ जून रोजी लोहगड

Moshi accident : १ महिन्यापूर्वी नोकरी अन् अवघ्या महिन्यांपूर्वी थाटला होता संसार; मोशी दुर्घटनेने सावंत कुटुंबाचा आधार हिरावला!

पुणे : मोशी येथील कचरा डेपोमध्ये कोसळलेल्या प्रशासकीय इमारतीच्या दुर्घटनेतील बचावकार्य अद्यापही युद्धपातळीवर

Maharashtra ATS Raids : पाकिस्तानी गुंडांशी सोशल मीडिया कनेक्शन! कोल्हापूरच्या २ तरुणांची १० तास कसून चौकशी; 'एटीएस'कडून राज्यभरात ११२ तरुणांची झाडाझडती

कोल्हापूर : पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी, आबिद जाट आणि राणा हनेने यांच्या कथित सोशल मीडिया नेटवर्कशी संपर्क