मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी बेस्ट बससेवा दुसऱ्या दिवशीही ठप्प राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने पुकारलेला संप अद्याप मागे घेण्यात आलेला नसून प्रशासनासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरल्याचा दावा संघटनांनी केला आहे. त्यामुळे शनिवारीही लाखो मुंबईकरांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (BEST Strike)
शुक्रवारी संपामुळे बेस्टची सेवा जवळपास पूर्णपणे ठप्प झाली होती. दररोज सुमारे २,७६६ बस रस्त्यावर धावणाऱ्या बेस्टकडून दिवसभरात केवळ ४८ बस चालवण्यात आल्या. यामध्ये बेस्टच्या मालकीच्या फक्त ९ बस तर उर्वरित ३९ बस वेट-लीजवरील होत्या. परिणामी बसस्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आणि पर्यायी वाहतूक व्यवस्थेवर प्रचंड ताण निर्माण झाला. (BEST Strike)
मुंबई : भायखळा पश्चिम येथील दगडी चाळ परिसरात शुक्रवारी रात्री धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीच्या पाडकामादरम्यान भिंतीचा काही भाग अचानक ...
चर्चेनंतरही तोडगा नाही :
संपाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक पार पडली. बैठकीत अनेक मागण्यांवर चर्चा झाली आणि काही मुद्द्यांवर सकारात्मक संकेत मिळाल्याचे सांगण्यात आले. मात्र कृती समितीने सरकारकडून ठोस निर्णय किंवा लेखी आश्वासन मिळाले नसल्याचे सांगत संप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. संघटनांच्या मते, केवळ चर्चांमुळे प्रश्न सुटणार नाहीत. राज्य सरकारने थेट हस्तक्षेप करून मागण्यांवर स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी त्यांची मागणी आहे. (BEST Strike)
संपादरम्यान तोडफोडीच्या घटना :
प्रशासनाचे संप मागे घेण्याचे आवाहन :
बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केले की, सर्व कामगार संघटना या संपात सहभागी झालेल्या नाहीत. बेस्ट वर्कर्स युनियनने या आंदोलनात सहभाग घेतलेला नसल्याचेही प्रशासनाने सांगितले. १८ जून रोजी झालेल्या बैठकीत अनेक मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही सुरू असल्याची माहिती संघटनांना देण्यात आली होती. त्यामुळे कामगारांनी संप मागे घेऊन चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (BEST Strike)
मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर निर्णय :
बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीने अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट आश्वासन मिळण्याची अट घातली आहे. त्यामुळे आज राज्य सरकार आणि कृती समिती यांच्यात महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे कर्मचारी तसेच मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. (BEST Strike)
मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या ...
बेस्ट कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
- बेस्ट सेवांचे कंत्राटीकरण तातडीने थांबवावे - बेस्टच्या मालमत्तांचा पीपीपी तत्त्वावरील पुनर्विकास रद्द करावा - बेस्टचा स्वतंत्र अर्थसंकल्प मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा - निवृत्त कर्मचाऱ्यांची थकीत देणी एकरकमी अदा करावीत - कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर त्वरित निर्णय घ्यावा (BEST Strike)
मुंबईकरांवर काय परिणाम?
बेस्ट संपामुळे लाखो प्रवाशांची गैरसोय होत असून लोकल रेल्वे, टॅक्सी, रिक्षा आणि खासगी वाहनांवर ताण वाढला आहे. शहरातील वाहतूक कोंडी तीव्र होण्याची शक्यता असून दैनंदिन कामकाजावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. जर संप आणखी लांबला, तर मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसमोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. (BEST Strike)





