Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. ए. एस. चंदुरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की फुटपाथांवर पायी चालणाऱ्या नागरिकांचा हक्क हा रस्त्यावरील वाहनांच्या हालचालींपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.


सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की हा अधिकार संविधानाच्या अनुच्छेद 19(1)(d) (देशात कुठेही मुक्तपणे फिरण्याचा हक्क) आणि अनुच्छेद 21 (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) अंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहे.खंडपीठाने स्पष्ट केले की ज्या रस्त्यांची निर्मिती केली जाते, तेथे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सीमांकित फुटपाथ असणे तसेच त्यांचे योग्य देखभाल करणे हे स्थानिक प्रशासनाचे बंधनकारक कर्तव्य आहे. हा एक कायदेशीररित्या अंमलात आणता येणारा अधिकार असल्याचेही न्यायालयाने ठामपणे सांगितले. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एका मोटार अपघात प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सकाळी शाळेत जात असताना एका टँकरने त्याला धडक दिली होती. त्या ठिकाणी फुटपाथ किंवा पादचारी क्रॉसिंग नव्हते.


सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मुलाच्या वडिलांना देण्यात येणारी भरपाई वाढवून 11,44,628 रुपये इतकी केली आहेत. तसेच 2 महिन्यांच्या आत ही रक्कम देण्याचे आदेश देखील कोर्टाने आहेत. तसेच उच्च न्यायालयाने दिलेला कमी भरपाईचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की पादचाऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध संविधानिक तसेच कायदेशीर मार्गाने भरपाई आणि न्याय मागण्याचा हक्क असेल. हा उपाय मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत असलेल्या दाव्यांपासून स्वतंत्र असेल.खंडपीठाने शहरी नियोजनावरही भाष्य करताना सांगितले की भारतीय शहरांमध्ये वाहनांना प्राधान्य देण्यात आले असून त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मनुष्य वाहनांपूर्वीपासून चालत आला आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सुरक्षित आणि सुसज्ज फुटपाथांची आवश्यकता अधोरेखित केली.

Comments
Add Comment

Wife Murders Husband : 'दृश्यम' पेक्षाही भारी! दोन वर्षांपासून बेपत्ता; अखेर १५ फूट खोल खड्ड्यात आढळला पतीचा मृतदेह

दारूमध्ये सायनाइड मिसळून केला खून, मृतदेह १५ फूट खोल खड्ड्यात पुरला; जामनगर पोलिसांनी पत्नी आणि प्रियकराला केली

Alien Temple : देशातील पहिलं अनोखं मंदिर पाहिलंत का ?

आपल्या भारत देशात विविध वैशिष्ट्ये आणि आख्यायिका असणारी हजारो मंदिरे आहेत. परंतु, तामिळनाडूमधील एका मंदिराने

Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात तब्बल १४ दिवस बँका राहणार बंद; आरबीआयकडून सुट्ट्यांची यादी जाहीर!

जर तुम्हाला ऑगस्ट महिन्यात बँकेचे काही महत्त्वाचे व्यवहार किंवा कामे करायची असतील, तर ही बातमी तुमच्यासाठी

Bengaluru News : बेंगळुरू हादरले! मुलीच्या पगारावर डोळा अन् लग्नासाठी ४० लाखांचा हट्ट; विरोध करताच वडिलांनी कॉलेजमध्येच...

बेंगळुरू : आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन करिअरमध्ये यशस्वी व्हावे आणि आनंदाने संसार थाटावा, अशी प्रत्येक

Rajkot Accident : राजकोटमध्ये भरधाव रिक्षाने वृद्ध महिलेला दिली जाेरदार धडक, थरारक घटना सीसीटीव्हीत कैद

राजकोट : गुजरात मधील राजकोट येथील १५० फीट रिंग रोडवरील आंबेडकर चौकाजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडल्याची घटना समोर

Kanwar Yatra 2026 : २०२६ ची कावड यात्रा सुरू; जाणून घ्या तारीख, महत्त्व आणि इतर महत्त्वाची माहिती

दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो शिवभक्तांच्या आतुरतेने वाट पाहिली जाणारी कावड यात्रा (Kanwar Yatra 2026) आजपासून अधिकृतपणे