Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. न्या. पी. एस. नरसिंह आणि न्या. ए. एस. चंदुरकर यांच्या खंडपीठाने सांगितले की फुटपाथांवर पायी चालणाऱ्या नागरिकांचा हक्क हा रस्त्यावरील वाहनांच्या हालचालींपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे.


सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले की हा अधिकार संविधानाच्या अनुच्छेद 19(1)(d) (देशात कुठेही मुक्तपणे फिरण्याचा हक्क) आणि अनुच्छेद 21 (जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क) अंतर्गत पूर्णपणे संरक्षित आहे.खंडपीठाने स्पष्ट केले की ज्या रस्त्यांची निर्मिती केली जाते, तेथे पादचाऱ्यांसाठी स्वतंत्र आणि सीमांकित फुटपाथ असणे तसेच त्यांचे योग्य देखभाल करणे हे स्थानिक प्रशासनाचे बंधनकारक कर्तव्य आहे. हा एक कायदेशीररित्या अंमलात आणता येणारा अधिकार असल्याचेही न्यायालयाने ठामपणे सांगितले. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय एका मोटार अपघात प्रकरणाशी संबंधित आहे, ज्यात पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. सकाळी शाळेत जात असताना एका टँकरने त्याला धडक दिली होती. त्या ठिकाणी फुटपाथ किंवा पादचारी क्रॉसिंग नव्हते.


सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात मुलाच्या वडिलांना देण्यात येणारी भरपाई वाढवून 11,44,628 रुपये इतकी केली आहेत. तसेच 2 महिन्यांच्या आत ही रक्कम देण्याचे आदेश देखील कोर्टाने आहेत. तसेच उच्च न्यायालयाने दिलेला कमी भरपाईचा निर्णयही रद्द करण्यात आला आहे.न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की पादचाऱ्यांच्या अधिकारांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध संविधानिक तसेच कायदेशीर मार्गाने भरपाई आणि न्याय मागण्याचा हक्क असेल. हा उपाय मोटार वाहन कायदा, 1988 अंतर्गत असलेल्या दाव्यांपासून स्वतंत्र असेल.खंडपीठाने शहरी नियोजनावरही भाष्य करताना सांगितले की भारतीय शहरांमध्ये वाहनांना प्राधान्य देण्यात आले असून त्यामुळे पादचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. मनुष्य वाहनांपूर्वीपासून चालत आला आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सुरक्षित आणि सुसज्ज फुटपाथांची आवश्यकता अधोरेखित केली.

Comments
Add Comment

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र

Swiss Bank : स्विस बँकांमधील भारतीयांचा निधी घटला, वैयक्तिक खात्यांतील ठेवींमध्ये वाढ

नवी दिल्ली : स्विस बँकांमध्ये भारतीयांनी ठेवलेल्या कथित काळ्या धनाबाबत सातत्याने चर्चा होत असताना,

Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या हस्ते PMVBRY लाभ वितरण कार्यक्रम; २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित

नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र

Narendra Modi : दहशतवाद आणि सिंधू जल करार एकत्र शक्य नाही, भारताने पाकिस्तानला सुनावले

नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने

EPFO : आता एटीएम आणि यूपीआयद्वारे काढता येणार पीएफचे पैसे; लवकरच सुविधा होणार सुरू

Navi Delhi : नोकरदारांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. आता पीएफ (PF) खात्यातील पैसे काढण्यासाठी

kedarnath yatra animal cruelty : भक्तीच्या नावाखाली क्रूरतेचा कळस! केदारनाथमध्ये मृत घोड्याला फरफटत नेले आणि...हृदयद्रावक व्हिडीओ व्हायरल

उत्तराखंड : उत्तराखंडमधील निसर्गरम्य आणि पवित्र 'छोटा चार धाम' पैकी एक असलेल्या केदारनाथमध्ये सध्या यात्रेची