Nitesh Rane : आदित्य ठाकरे 'उबाठा'चा अभिषेक बॅनर्जी!

 मंत्री नितेश राणेंचा टोला; 'महाराष्ट्रात फिरण्यासाठी त्यांना हेल्मेट पाठवणार'


मुंबई : "उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, म्हणूनच ६ खासदारांनी बाळासाहेबांचे विचार वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले. आदित्य ठाकरे (Aditya Tackarey) हे महाराष्ट्रातील अभिषेक बॅनर्जी आहेत, त्यांना आधी आवरले असते तर आज उबाठावर ही नामुष्की आली नसती," असा टोला भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी शुक्रवारी लगावला. 'ऑपरेशन टायगर'बाबत कणकवली येथे माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते.



मंत्री राणे (Nitesh Rane) म्हणाले, "ऑपरेशन टायगरबाबत शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांनी माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी आता काहीही ओरड केली तरी त्याला अर्थ नाही. पण या बंडाला जबाबदार कोण याचा विचार उबाठाने करावा. जसे तृणमूल काँग्रेसमध्ये एक अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) आहे, तसा आदित्य हा उबाठाचा अभिषेक बॅनर्जी आहे. आदित्यला कोणी प्रश्न का विचारत नाही की, तू पक्षात असताना तुझे खासदार तुला सोडून का गेले? जशी अभिषेक बॅनर्जींवर पश्चिम बंगालमध्ये हेल्मेट घालून फिरण्याची वेळ आली, तसे एक हेल्मेट मी आदित्य ठाकरेंना पाठवणार आहे. महाराष्ट्रामध्ये फिरताना संतापलेल्या जनतेकडून चुकून अंडी आणि चपला आल्या, तर संरक्षणासाठी हे हेल्मेट हवे. पण 'पेंग्विन' हेल्मेट घालून कसा दिसेल, हे एक वेगळेच संशोधन आहे", अशी कोपरखळीही त्यांनी काढली



नितेश राणे यांनी या वेळी उद्धव ठाकरेंवर काँग्रेसचरणी लीन झाल्याचा आरोप केला. ते म्हणाले, "उद्धव ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार होता, म्हणून ६ खासदारांनी एकनाथ शिंदे (Ek Nath Shinde ) यांचे नेतृत्व स्वीकारले. 'माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही, नाहीतर दुकान बंद करेन,' असे ठणकावून सांगणारे आमचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देण्याचे पाप मातोश्रीने केले. आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात गुप्त बैठका झाल्या होत्या. आदित्य ठाकरेंना काँग्रेसचा राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्याचा प्रस्ताव आला होता. जर बाळासाहेबांचे विचारच यांना बुडवायचे असतील, तर स्वाभिमानी खासदार यांच्यासोबत कशाला राहतील? तुम्ही काँग्रेसमध्ये विलीन होणार असाल तर आता नेहरू, गांधींचाच गोडवा गात बसा," असा हल्लाबोल त्यांनी केला.



सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर!


बंडखोर खासदारांना 'वाय+'(Y plus Security) सुरक्षा पुरवल्याच्या मुद्द्यावर रोहित पवार आणि संजय राऊत यांनी केलेल्या टीकेचाही राणे यांनी खरपूस समाचार घेतला. "गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस लावले म्हणतात, मग उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर स्वतःचे सरकारी संरक्षण सोडावे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसले आहेत. हिंदुत्वावर तयार झालेल्या शिवसैनिकांनी जेव्हा पाहिले की पक्षनेतृत्व काँग्रेसच्या विचारांना, जिहादला आणि हिंदुत्वविरोधी भूमिकेला स्वीकारत आहे, तेव्हा त्यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला.

"> संजय राऊत सारख्या राजकीय लावारिस माणसाने यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपला ओढू नये. हा बाळासाहेबांच्या विचारांसाठी एकनाथ शिंदे यांनी टाकलेला खंबीर पाय आहे," असे नितेश राणे म्हणाले.

Tags
भाजपशिवसेनाnitesh raneउद्धव ठाकरेमातोश्रीमहायुतीआदित्य ठाकरेshiv senaUddhav ThackerayMaharashtra politicsअभिषेक बॅनर्जीmatoshreePolitical NewsUBTउबाठामहाराष्ट्र राजकारणbjpOperation Tigerbreaking newsAbhishek Banerjee"ऑपरेशन टायगर"नितीश राणेAaditya Thackeray
Comments
Add Comment

Abhijit Bangar : खड्ड्यांच्या प्रत्येक तक्रारीचे २४ तासांच्या आत निराकरण 

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांचे निर्देश मुंबई :  महानगरपालिका (BMC) हद्दीतील

BEST Strike : 'बेस्ट' संपावर तातडीने तोडगा काढून 'नीट' परीक्षार्थींना दिलासा द्या

माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी मुंबई,  : गुरुवारच्या मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या

Navnath Ban : संजय राऊतांनी औरंगजेबाचा इतिहास सांगायला हवा

भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात MUMBAI : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती शिवाजी

BMC : नाना शंकर शेठ यांच्या व्यक्तीमत्वाला साजेसे स्मारक उभारा

स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मुंबई (विशेष प्रतिनिधी) आधुनिक मुंबईचे शिल्पकार, शिक्षणप्रेमी आणि

PM Narendra Modi : PM मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा शुभारंभ होणार; मुंबई आणि नागपूरच्या EPFO कार्यालयात विशेष कार्यक्रम होणार

मुंबई : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या (Central Government)

Shivsena Vardhapan Din 2026: शिवसेना वर्धापन दिनासाठी मुंबईत कडेकोट पोलीस बंदोबस्त

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena)  ६०व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठ्या घडामोडी