नवी दिल्ली : रोजगार निर्मितीला चालना देणे आणि सामाजिक सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना (PMVBRY) अंतर्गत लाभ वितरण कार्यक्रम शुक्रवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे उत्साहात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरातील लाखो लाभार्थ्यांना सुमारे २,४०० कोटी रुपयांचे लाभ वितरित करण्यात आले.या कार्यक्रमाला केंद्रीय श्रम व रोजगार तसेच युवा व्यवहार व क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया, केंद्रीय श्रम व रोजगार राज्यमंत्री तसेच एमएसएमई राज्यमंत्री शोभा करांदलाजे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशभरातील विविध राज्ये आणि औद्योगिक केंद्रांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सुमारे २०० समांतर कार्यक्रमांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्य कार्यक्रमाशी जोडण्यात आले होते.
'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडालेली असतानाच, ...
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी रोजगार निर्मिती, कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षेच्या माध्यमातून विकसित भारताच्या उभारणीसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. औपचारिक क्षेत्रातील रोजगार वाढविणे आणि तरुणांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देणे हे सरकारचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले.PMVBRY योजनेच्या ‘भाग अ’ अंतर्गत पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या ईपीएफ वेतनाइतके, कमाल १५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. तर ‘भाग ब’ अंतर्गत अतिरिक्त रोजगार निर्माण करणाऱ्या पात्र नियोक्त्यांना प्रत्येक अतिरिक्त कर्मचाऱ्यासाठी दरमहा ३ हजार रुपयांपर्यंत आर्थिक प्रोत्साहन देण्यात येते.
नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने १९६० मधील सिंधू जल करार हा आजच्या ...
केंद्र सरकारने या योजनेसाठी ९९,४४६ कोटी रुपयांची तरतूद केली असून १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत देशभरात ३.५ कोटींहून अधिक रोजगार निर्मितीचे लक्ष्य ठेवले आहे. योजनेमुळे तरुणांना औपचारिक क्षेत्रात रोजगार मिळण्यास मदत होणार असून सामाजिक सुरक्षा योजनांच्या कक्षेतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात
नवी दिल्ली : भारताने संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) पाकिस्तानला जोरदार फटकारले आहे. भारताने १९६० मधील सिंधू जल करार हा आजच्या ...