पाऊस कधी येणार? उष्णतेने नागरिक हैराण
Maharashtra Weather Update: जून महिना अर्धा संपत आला असला तरी राज्यात मान्सूनची (Monsoon) जोरदार सुरुवात अद्याप झालेली नाही. त्यामुळे अनेक भागांमध्ये उष्णता, दमट वातावरण आणि उकाड्याचा त्रास वाढला आहे. पावसाची प्रतीक्षा लांबत असल्याने शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे. हवामान विभागाने (Weather Forecast) राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट वातावरण कायम आहे. काही भागांमध्ये हलक्या सरींची शक्यता असली तरी तापमान वाढल्यामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि घामामुळे अनेक ठिकाणी अस्वस्थता जाणवत आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबई : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या (Central Government) महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री ...
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र सोलापूर जिल्ह्यात उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत आवश्यक असल्याशिवाय बाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा प्रभाव कायम असून तापमानात वाढ झाली आहे. परभणी आणि हिंगोली भागात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडू शकतात. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे.
मुंबई : देशभरात आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल झाल्यानंतर अचानक थबकलेल्या मान्सूनच्या प्रगतीसाठी आता पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा आणि अमरावती जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. काही भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (Rain Alert Maharashtra)
दरम्यान, २० जूननंतर मान्सूनला गती मिळू शकते, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तोपर्यंत नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, उन्हात जाणे टाळणे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.






