- भायखळा येथील महानगरपालिका शाळेत पार पडला प्रवेशोत्सव सोहळा
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
शाळा ही केवळ शिक्षण घेण्याची जागा नसून ती मुलांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचे, त्यांच्यात संस्कार रुजविण्याचे आणि स्वप्नांना नवी दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण केंद्र असते. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा आणि विद्यार्थ्यांना अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी अभिमानाची आणि कौतुकास्पद असल्याचे उद्गार माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी काढले.
शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर, महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, राज्यपाल यांचे सचिव प्रशांत नारनवरे, राज्य प्रकल्प संचालक (समग्र शिक्षा अभियान) संजय यादव, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर, उप आयुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, ई विभागाचे सहायक आयुक्त आनंद कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कीर्तीवर्धन किरीतकुडवे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक या सोहळ्यास उपस्थित होते.
- पालघरमधील चहाडे गावात लावणार ४००६ झाडे लावणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) गोरेगाव (पश्चिम) येथील मोतीलाल नगरमधील म्हाडाच्या घरांचा पुनर्विकास क्लस्टर ...
दरम्यान, घाटकोपरमध्ये पालकमंत्री (मुंबई उपनगरे) आशिष शेलार, महापौर रितू तावडे यांच्याकडून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले, माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संकल्पित केलेल्या विकसित भारताच्या स्वप्नांची पूर्तता करण्यात हीच मुले सर्वांत मोलाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी, संस्कारांसाठी आणि शिक्षणासाठी कार्य करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. आज शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवीन वह्या, रंगीबेरंगी शालेय साहित्य आणि नवीन पाण्याची बाटली मिळाली. नवीन पुस्तकांचा सुगंध आणि नव्या शैक्षणिक वर्षाचा उत्साहाच्या आठवणी अमूल्य असतात. शिक्षण हे समाज आणि राष्ट्राच्या विकासाचे सर्वांत प्रभावी माध्यम आहे. मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वांत सक्षम आणि संसाधनसंपन्न महानगरपालिका आहे. महानगरपालिकेच्या शाळा विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. यासोबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने शाळांमध्ये संगीत आणि योग शिक्षणाला अधिक प्रोत्साहन द्यावे. संगीत मन अधिक संवेदनशील बनवते, तर योग शरीर आणि मन दोन्ही निरोगी ठेवण्यास मदत करतो, असे त्यांनी सांगितले.

महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण आणि सोयीसुविधा देण्यासाठी महानगरपालिका सतत प्रयत्नशील असते. महानगरपालिका आठ भाषांमधून शिक्षण देते. शिक्षणासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक साहित्य मोफत दिले जाते. यामुळे पालकांवरील आर्थिक भार कमी होता, सोबतच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठीही मोलाची मदत होते. महानगरपालिकेच्या सर्व शाळा मिळून यावर्षी ३५ हजार नवीन विद्यार्थी प्रवेश झाल्याची माहिती त्यांनी दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता सारखे क्षेत्र आता खुले झाले आहेत. त्यामुळे आव्हाने वाढली असली तर महानगरपालिकेच्या शाळांमधील मुले या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले. महानगरपालिका चांगल्या आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी नमूद केले.
बाधित झाडांच्या तुलनेत एमएमआरडी लावणार ७६६६ झाडे मुंबई (सचिन धानजी) घाटकोपर ते मुलंंडमधील मुंबई महापालिकेच्या 'एन', 'एस' आणि 'टी' विभाग कार्यालयाच्या ...
राजेश्री शिरवडकर यांनी प्रास्ताविकात शाळा प्रवेशोत्सवाची तयारी, शालेय साहित्य वाटपांबाबतची माहिती दिली. महानगरपालिकेच्या शाळांवर पालकांचा विश्वास असल्यामुळेच विद्यार्थी संख्या वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले. अतिरिक्तआयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांनी आभार मानले.
प्रवेशोत्सव सोहळ्यात विद्यार्थ्यांना माननीय राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते २७ प्रकारच्या शालेय साहित्याचे प्रातिनिधिक स्वरुपात वितरण करण्यात आले. तसेच गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबतच राज्यपाल महोदयांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनही देण्यात आले. शाळा प्रवेशोत्सवात राज्यपाल यांनी शाळेतील वर्गखोल्यांनाही भेट दिली.