महायुतीत बिनसले; सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीवरून भाजप-शिवसेनेत धुसफूस
मुंबई : स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात महायुतीमधील अंतर्गत कलह कमालीचा उफाळून आला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यातील राजकीय गणिते पाहता, 'झेडपी'तील धक्काबुक्कीचा बदला घेण्याची तयारी शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग; शिवसेनेच्या वर्धापन दिनाला राजकीय भूकंपाची शक्यता मुंबई : लोकसभेतील ९ पैकी तब्बल ५ खासदारांनी 'मातोश्री'वरील बैठकीला ...
काही दिवसांपूर्वी सातारा जिल्हा परिषदेत (झेडपी) झालेल्या धक्काबुक्कीची आणि राजकीय वर्चस्ववादाची पार्श्वभूमी या संघर्षाला लाभल्याची चर्चात आहे. या पार्श्वभूमीवर, नुकतीच १३ जून रोजी कराड येथे सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीच्या रणनीतीसाठी भाजपने महायुतीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीला खासदार उदयनराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार अतुल बाबा भोसले आणि चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे नेते उपस्थित होते. मात्र, या समन्वय बैठकीकडे शिवसेना नेते मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील या दोघांनीही पाठ फिरवली.
या संपूर्ण वादावर माध्यम प्रतिनिधींशी बोलताना मंत्री शंभूराज देसाई यांनी स्थानिक भाजपच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. ते म्हणाले, "पालकमंत्री म्हणून मी यापूर्वी नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी सर्व पक्षांमध्ये समन्वय साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला होता. मात्र, भाजपच्या दोन्ही मंत्र्यांनी आणि स्थानिक नेत्यांनी त्याला कोणताही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. एकीकडे पालकमंत्री समन्वय साधत असताना तुम्ही फिरकत नाही आणि दुसरीकडे त्याच बैठकीत भाजप स्वबळावर लढणार असल्याची एकतर्फी घोषणा करता; तुमचा जर हाच प्रतिसाद असेल, तर आम्हालाही आमची भूमिका बदलावी लागेल. आता निर्माण होणाऱ्या कोणत्याही राजकीय परिस्थितीला केवळ भाजपलाच सामोरे जावे लागेल," असा इशारा देसाई यांनी दिला.
मुंबई, : वाढत्या इंधन खर्चामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळावर पडणारा आर्थिक भार लक्षात घेऊन नाईलाजास्तव साध्या बससेवांसाठी लागू करण्यात ...
सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने आपल्याकडील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापतींना एकत्र करत थेट 'पर्यटनासाठी' सुरक्षित स्थळी नेण्याची तयारी सुरू केली आहे. यावर बोलताना देसाई यांनी, भाजप काय करतेय याच्याशी आम्हाला देणेघेणे नाही. आमची कोअर कमिटीची बैठक पार पडली असून, उद्या आम्ही आमच्या सर्व स्थानिक सदस्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली आहे. या बैठकीत सदस्यांची जी भावना असेल, ती आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू आणि अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवरच घेतला जाईल," असे स्पष्ट केले. मात्र, ऐन मतदानाच्या तोंडावर शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे सातारा आणि सांगलीतील राजकीय समीकरणे महायुतीसाठी आव्हानात्मक ठरण्याची चिन्हे आहेत.




