परदेशी शिक्षण महागलं! घसरत्या रुपयामुळे विद्यार्थ्यांची कोंडी

अमेरिकन डॉलर आणि इतर जागतिक चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले आहे.
दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र, सध्या परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर एक मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. गेल्या एका वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशी शिक्षणाचा प्रवास अत्यंत महागडा झाला असून पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.




रुपया केवळ डॉलरच्या तुलनेत घसरला नाही. तर आशियातील सर्वात कमजोर चलन ठरले आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील इतर प्रमुख देशांच्या चलनांच्या तुलनेतही रुपया कोसळला आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांना पैसे पाठवताना पालकांची आर्थिक ओढाताण होत आहे. ‘युनिव्हर्सिटी लिविंग’चे संस्थापक आणि सीईओ सौरभ अरोरा यांच्या मते, रुपयाच्या घसरणीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक खर्चात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करायला वर्षाला ३५ ते ७० लाख रुपये खर्च होता, तिथे आता अतिरिक्त ४ ते ८ लाख रुपये जास्त मोजावे लागत आहेत. ‘वनस्टेप ग्लोबल’चे संचालक स्टीफन रोच यांच्या विश्लेषणानुसार, दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवीसाठी ५० ते ६० लाख रुपयांचे बजेट ठेवलेल्या विद्यार्थ्यांना आता कोणतीही शुल्कवाढ झाली नसताना, ५ ते ७ लाख रुपये जास्त द्यावे लागत आहेत.

Comments
Add Comment

Tax Devolution To Maharashtra : केंद्र सरकारकडून राज्यांना १ लाख हजार कोटींचे कर वितरण

महाराष्ट्राला ७ हजार २२ कोटींचा अतिरिक्त निधी नवी दिल्ली : राज्यांच्या वित्तीय व्यवस्थेला बळकटी देत

Gold Silver New Rate : ऑगस्टच्या पहिल्याच दिवशी सोनं महागलं! जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्या चांदीचे नवीन दर

मुंबई : ऑगस्ट महिन्याची सुरुवात सराफा बाजारासाठी तेजीची ठरली आहे. १ ऑगस्ट रोजी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या

Nitin Gadkari : ई-20 पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होऊ शकते - गडकरी

नवी दिल्ली : ई-20 (इथेनॉल) मिश्रित पेट्रोल वापरल्याने वाहनांचे नुकसान होऊ शकते, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक

IndiGo Airlines : पर्यटन मंत्रालयाचा इंडिगोसोबत सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवी दिल्ली येथे भारताला जागतिक स्तरावरील पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून

Sugar Stock Rules : साखरसाठ्यावर केंद्राचे निर्बंध; ३० दिवसांपेक्षा अधिकचा साठा ठेवण्यास मनाई; कमाल मर्यादा ४,००० क्विंटल

नवी दिल्ली: अपुऱ्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर देशात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि

LIC of India : एलआयसी ऑफ इंडियातर्फे भारत सरकारला १२,२०७ कोटी रुपये लाभांशाचा धनादेश सुपूर्द

मुंबई : एलआयसी ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) श्री. आर. दोराईस्वामी यांनी आज