इन्स्टाग्राम पोस्ट करून टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करणाऱ्याला पोलिसांनी वाचवले

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूरचा रहिवासी असलेला एक तरुण मानसिक तणावाखाली होता. याच स्थितीत त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. एक इन्स्टा पोस्ट करून करत असलेल्या कृत्याची माहिती सार्वजनिक केली. मेटाच्या यंत्रणेने ही पोस्ट पोलिसांपर्यंत पोहोचवली. कानपूर पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने मुलाची पोस्ट बघितली आणि नियंत्रण कक्षाला माहिती दिली. यानंतर पोलीस पथक मुलाच्या घरी पोहोचले. अवघ्या सात मिनिटांत घरी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला गळफास घेण्यापासून रोखले.



सेन वेस्ट पारा या परिसरात राहणारा एक ३० वर्षीय तरुण प्रेयसीने बोलणे थांबवल्यामुळे मागील काही दिवसांपासून तीव्र मानसिक तणावाखाली होता. त्याने इतरांशी संवाद साधणे थांबवले होते. तरुण पुरता खचला होता आणि निराश झाला होता. त्या तरुणाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ अपलोड केला ज्यामध्ये त्याने आत्महत्या करत असल्याचे जाहीर केले. सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड होताच, इन्स्टाग्रामची मूळ कंपनी असलेल्या मेटाच्या सुरक्षा प्रणालीने याला एक गंभीर बाब मानून तात्काळ ही माहिती थेट पोलीस मुख्यालयात पोहोचली.



पोलिसांची घटनास्थळी धाव


पोलीस मुख्यालयाकडून कानपूर आयुक्तालयाच्या मीडिया सेलकडे व्हिडिओ पाठवण्यात आली. त्या तरुणाचे ठिकाण, मोबाईल नंबर आणि पत्ता यासह महत्त्वाची माहिती तात्काळ सेन वेस्ट पारा पोलीस स्टेशनला देण्यात आली. माहिती मिळताच, इन्स्पेक्टर कादीर खान आणि हरवीर सिंग, त्यांची टीम घटनास्थळी पोहोचली. अवघ्या सात मिनिटांत घरी पोहोचलेल्या पोलिसांनी मुलाला टोकाचे पाऊल उचलण्यापासून रोखले.


जेव्हा अधिकारी पोहोचले, तेव्हा तो तरुण गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता. पोलीस टीमने तात्काळ कारवाई केली आणि त्या तरुणाला सुरक्षितपणे खाली उतरवले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे त्याचा जीव वाचला. नंतर, त्याच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आणि त्या तरुणाला आवश्यक ती मदत पुरवण्यात आली.

Comments
Add Comment

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Mumbai 3 Pipeline : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याचे

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे