New Delhi Fire Case : दिल्लीच्या तुघलकाबादमध्ये इमारतीला आग लागली नाही लावली, ३ जणांना जिवंत जाळले ?

नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात १२ जूनच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास एका इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना जवळच्या एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पंकज पांडे, सुशीला देवी आणि सोनिया कुमारी या तीन जणांचा मृत्यू झाला. नियमानुसार आग प्रकरणी चौकशी सुरू झाली. ही चौकशी करत असताना पोलिसांना आग लागल्याचा नाही तर आग लावण्यात आल्याचा संशय येऊ लागला. एक सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.



पोलिसांनी तपासलेल्या फूटेजमध्ये एका कॅमेऱ्याचे फूटेज आग लावण्यात आल्याचा संशय गडद करण्यास कारणीभूत ठरले आहे. या फूटेजमध्ये इमारतीत वावरत असलेल्या एका मुलीच्या हालचाली अतिशय संशयास्पद अशा आहेत. या मुलीला कोणीतरी आग लावण्यास सांगितल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर संबंधित मुलीला शोधून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.



सरिता नावाच्या इमारतीतच राहणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून मध्यरात्री आग लावल्याची कबुली मुलीने पोलिसांसमोर दिली आहे. सरिताने पेट्रोल आणि काडेपेटी दिली. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दीपकच्या स्कूटरला आग लावण्याची योजना होती. मात्र, आग केवळ स्कूटरपुरती मर्यादित राहिली नाही. तिने झपाट्याने संपूर्ण इमारतीला आपल्या भक्ष्यस्थानी पाडले. या आगीत तीन जणांचा बळी गेला आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून गेले.



दीपक आणि निरंजन यांच्यात बऱ्याच काळापासून आर्थिक वाद होता. धक्कादायक बाब म्हणजे, दीपक हा बाहेरचा नसून निरंजनचा चुलत भाऊ आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजनला दीपकवर सूड घ्यायचा होता. म्हणूनच त्याने त्याच्या स्कूटरला लक्ष्य करण्याची योजना आखली. पण स्कूटर जाळण्याचा प्रयत्न सुरू असताना आग पसरली आणि संपूर्ण इमारत संकटात सापडली. या प्रकरणी पोलिसांनी सरिता, निरंजन आणि राजकुमार यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोविंदपुरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

Mankhurd : मानखुर्दमध्ये चाळीचा भाग कोसळला, पाच जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

मुंबई : मुंबईत सतत पडत असलेल्या पावसामुळे मानखुर्दमध्ये एक मोठी दुर्घटना झाली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरांतील

Indian Navy : भारतीय नौदलाची ताकद वाढणार; 'आयएनएस महेंद्रगिरी' आणि 'आयएनएस मालवण' लवकरच ताफ्यात येणार

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढणार असून लवकरच ‘आयएनएस महेंद्रगिरी’ आणि ‘आयएनएस मालवण’ या दोन

School - College Holidays : मोठी बातमी! मुंबई, ठाणे, पनवेलसह सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुटी; मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि पनवेल येथे सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी ऑरेंज अलर्ट जारी करत मुसळधार

Prakash Abitkar : वारीत अत्यावश्यक रुग्णांसाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची सुविधा!

भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची आणि आरोग्य संपन्न वारी या डिजिटल उपक्रमाची सुरुवात मुंबई : आषाढी यात्रेच्या

Indian Navy : भारतीय नौदलाच्या युद्धनौकांच्या सिंगापूर भेटीची यशस्वी सांगता

नवी दिल्ली : भारत आणि सिंगापूर यांच्यातील दृढ सामरिक आणि सागरी भागीदारी अधिक मजबूत करत भारतीय नौदलाच्या पूर्व

Mumbai Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती; विक्रोळी येथे बोअरिंगचे काम सुरू

मुंबई (Mumbai): मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पासाठी, पहिल्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) आज विक्रोळी