New Delhi Fire Case : दिल्लीच्या तुघलकाबादमध्ये इमारतीला आग लागली नाही लावली, ३ जणांना जिवंत जाळले ?

नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात १२ जूनच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास एका इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना जवळच्या एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पंकज पांडे, सुशीला देवी आणि सोनिया कुमारी या तीन जणांचा मृत्यू झाला. नियमानुसार आग प्रकरणी चौकशी सुरू झाली. ही चौकशी करत असताना पोलिसांना आग लागल्याचा नाही तर आग लावण्यात आल्याचा संशय येऊ लागला. एक सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.



पोलिसांनी तपासलेल्या फूटेजमध्ये एका कॅमेऱ्याचे फूटेज आग लावण्यात आल्याचा संशय गडद करण्यास कारणीभूत ठरले आहे. या फूटेजमध्ये इमारतीत वावरत असलेल्या एका मुलीच्या हालचाली अतिशय संशयास्पद अशा आहेत. या मुलीला कोणीतरी आग लावण्यास सांगितल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर संबंधित मुलीला शोधून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.



सरिता नावाच्या इमारतीतच राहणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून मध्यरात्री आग लावल्याची कबुली मुलीने पोलिसांसमोर दिली आहे. सरिताने पेट्रोल आणि काडेपेटी दिली. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दीपकच्या स्कूटरला आग लावण्याची योजना होती. मात्र, आग केवळ स्कूटरपुरती मर्यादित राहिली नाही. तिने झपाट्याने संपूर्ण इमारतीला आपल्या भक्ष्यस्थानी पाडले. या आगीत तीन जणांचा बळी गेला आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून गेले.



दीपक आणि निरंजन यांच्यात बऱ्याच काळापासून आर्थिक वाद होता. धक्कादायक बाब म्हणजे, दीपक हा बाहेरचा नसून निरंजनचा चुलत भाऊ आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजनला दीपकवर सूड घ्यायचा होता. म्हणूनच त्याने त्याच्या स्कूटरला लक्ष्य करण्याची योजना आखली. पण स्कूटर जाळण्याचा प्रयत्न सुरू असताना आग पसरली आणि संपूर्ण इमारत संकटात सापडली. या प्रकरणी पोलिसांनी सरिता, निरंजन आणि राजकुमार यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोविंदपुरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

Parul Chaudhary : पारुल चौधरीने फ्रान्समध्ये ५,००० मीटर शर्यतीत राष्ट्रीय विक्रम मोडला

पॅरिस : भारताच्या पारुल चौधरीने फ्रान्समधील नाईस येथे झालेल्या 'मीटिंग निकया २०२६' मध्ये महिलांच्या ५,००० मीटर

Raigad Accident : रत्नागिरीत जयगड जेसडब्ल्यू पोर्टवर ४५ मीटर उंचीवरून कोसळून कामगाराचा मृत्यू

रत्नागिरी : जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर काम करणाऱ्या एका ३७ वर्षीय कामगाराचा ४५ मीटर उंचीवरून खाली पडून

The honor of the palanquin : पालखी रथ आणि चौघडागाडीचा मान पुन्हा संस्थानच्या बैलजोड्यांना

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात पालखी रथ ओढण्याचा तसेच चौघडागाडीचा मान यंदाही श्री संत

Virat-1' ship sinks off : ओमानच्या किनाऱ्याजवळ 'विराट-१' जहाज बुडाले, अमेरिकी नौदलाकडून १४ भारतीय खलाशांची सुटका

नवी दिल्ली : आखाती प्रदेशात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, आणखी एक मोठा सागरी अपघात घडला आहे. भारतीय जहाज

जून महिना अर्धा संपला तरीही उन्हाचे चटके कायम

लातूर : जून महिना अर्धा संपत आला असताना लातूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका कायम आहे. मान्सूनच्या आगमनाकडे

Raigad Crime : पत्नी व दोन मुलींच्या मृत्यूप्रकरणी पतीला अटक; माणगाव पोलिसांची कारवाई

रायगड : माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासीवाडी येथे घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक दुर्दैवी घटनेप्रकरणी माणगाव