New Delhi Fire Case : दिल्लीच्या तुघलकाबादमध्ये इमारतीला आग लागली नाही लावली, ३ जणांना जिवंत जाळले ?

नवी दिल्ली : जुन्या दिल्लीतील तुघलकाबाद परिसरात १२ जूनच्या मध्यरात्री दोनच्या सुमारास एका इमारतीला आग लागली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या आठ जणांना जवळच्या एम्स ट्रॉमा सेंटर आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर पंकज पांडे, सुशीला देवी आणि सोनिया कुमारी या तीन जणांचा मृत्यू झाला. नियमानुसार आग प्रकरणी चौकशी सुरू झाली. ही चौकशी करत असताना पोलिसांना आग लागल्याचा नाही तर आग लावण्यात आल्याचा संशय येऊ लागला. एक सीसीटीव्ही फूटेज हाती आल्यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे.



पोलिसांनी तपासलेल्या फूटेजमध्ये एका कॅमेऱ्याचे फूटेज आग लावण्यात आल्याचा संशय गडद करण्यास कारणीभूत ठरले आहे. या फूटेजमध्ये इमारतीत वावरत असलेल्या एका मुलीच्या हालचाली अतिशय संशयास्पद अशा आहेत. या मुलीला कोणीतरी आग लावण्यास सांगितल्याचा संशय पोलिसांना आला. यानंतर संबंधित मुलीला शोधून पोलिसांनी तिची कसून चौकशी केली. या चौकशीतून पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली.



सरिता नावाच्या इमारतीतच राहणाऱ्या महिलेच्या सांगण्यावरून मध्यरात्री आग लावल्याची कबुली मुलीने पोलिसांसमोर दिली आहे. सरिताने पेट्रोल आणि काडेपेटी दिली. पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या दीपकच्या स्कूटरला आग लावण्याची योजना होती. मात्र, आग केवळ स्कूटरपुरती मर्यादित राहिली नाही. तिने झपाट्याने संपूर्ण इमारतीला आपल्या भक्ष्यस्थानी पाडले. या आगीत तीन जणांचा बळी गेला आणि अनेक कुटुंबांचे आयुष्य बदलून गेले.



दीपक आणि निरंजन यांच्यात बऱ्याच काळापासून आर्थिक वाद होता. धक्कादायक बाब म्हणजे, दीपक हा बाहेरचा नसून निरंजनचा चुलत भाऊ आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, निरंजनला दीपकवर सूड घ्यायचा होता. म्हणूनच त्याने त्याच्या स्कूटरला लक्ष्य करण्याची योजना आखली. पण स्कूटर जाळण्याचा प्रयत्न सुरू असताना आग पसरली आणि संपूर्ण इमारत संकटात सापडली. या प्रकरणी पोलिसांनी सरिता, निरंजन आणि राजकुमार यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलीलाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. गोविंदपुरी पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत आहेत.

Comments
Add Comment

Mirabai Chanu : मीराबाई चानूची सोनेरी हॅटट्रिक!

ग्लासगो : भारताची स्टार वेटलिफ्टर आणि ऑलिम्पिक पदकविजेती मीराबाई चानू हिने ग्लासगो २०२६ राष्ट्रकुल क्रीडा

Ind vs Zim : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली टी-२० मालिका; झिम्बाब्वेचा ३-० ने व्हाईटवॉश !

भारताचा ३५ धावांनी दणदणीत विजय ! हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील तिसऱ्या

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Question Paper Leak : प्रश्नपत्रिका फुटीविरोधी नवीन विधेयक लोकसभेत सादर होणार

नवी दिल्ली: प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणावरून संसदेत निर्माण झालेला गतिरोध आता संपण्याची चिन्हे असून, आंदोलक

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Narendra Modi : परीक्षा पद्धतीत सुधारणेसाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात उच्चाधिकार समितीची स्थापना, PM मोदींचा निर्णय

नवी दिल्ली : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि पेपरफुटीला आळा घालण्यासाठी नंदन निलेकणींच्या नेतृत्वात