Monsoon Update : मुंबईत मान्सूनच्या आगमनासाठी २० जून उजाडणार ?

Mumbai: अरबी समुद्रातील मान्सूनची शाखा सक्रिय असली तरी महाराष्ट्रातील मान्सूनचा पुढील प्रवास लांबल्याचे दिसत आहे. राज्यात मान्सून पोहोचला असला तरी नागरिकांना उकाडा आणि दमट हवामानापासून अद्याप दिलासा मिळालेला नाही. हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, मान्सूनचा पुढील प्रवास १९ ते २० जून पर्यंत लांबू शकतो. भारतीय हवामान विभागाने (IMD) काही दिवसांपूर्वीच माहिती दिली होती की, महाराष्ट्रात मान्सून काही दिवस पुढे सरकला आहे. मात्र १३ जूनच्या अद्ययावत अहवालात महाराष्ट्राचा उल्लेख वगळण्यात आला असून राज्यातील काही भागांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.



मुंबईत दमट उकाडा कायम


मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांत १६ जूनपर्यंत उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानंतर मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असली तरी मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची शक्यता कमी आहे. मुंबईतील किमान तापमान गेल्या सात दिवसांपासून ३० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक नोंदवले जात आहे. यामुळे मुंबईकरांना पावसासाठी आणखी वाट बघावी लागणार आहे.(Legal notice served to Amazon)



राज्यात उष्णता कायम


मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे रविवारी उष्णतेची तीव्रता वाढू शकते. तर अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांत सोमवारपर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. अमरावती आणि बुलढाणा येथे ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.



पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?


कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असले तरी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भाग अजूनही प्रतीक्षेत आहेत. पुण्यात कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि घाटमाथ्यावरील भागांत पूर्वमान्सूनच्या हलक्या सरी कोसळू शकतात. खानदेशात मान्सूनचे आगमन रखडले असून तापमान ३९ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ असले तरी उष्णता कायम राहणार आहे. पुढील आठवड्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी जोरदार पावसासाठी जुलै अखेरपर्यंत वाट पाहावी लागू शकते. हवामानातील या बदलांमुळे राज्यातील नागरिकांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. २० जूननंतर परिस्थितीत सुधारणा होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Byculla Police Station Fire: भायखळा पोलीस ठाण्याच्या पहिल्या मजल्यावर आग; अग्निशमन दलाकडून तातडीने नियंत्रण

मुंबई: मुंबईतील भायखळा पोलीस ठाण्यात रविवारी रात्री आग (Fire) लागल्याची घटना घडली. ही आग पोलीस ठाण्याच्या पहिल्या

Eknath Shinde : ठाणे शहरातील सर्वात मोठ्या वाहतूक सुधारणा प्रकल्पाला प्रारंभ; तीन हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्पाचे भूमिपूजन

ठाणेकरांच्या स्वप्नपूर्तीकडे एकनाथ शिंदेंचे आणखी एक मोठे पाऊल २०० कोटींच्या महत्त्वाकांक्षी कामामुळे दीड

Ashadhi Wari : आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

मुंबई  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच

Mumbai Crime News : मुंबई विमानतळ परिसरातील हॉटेलमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार; अहमदाबादच्या व्यावसायिकाला अटक

मुंबई : मुंबई शहरातील विमानतळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये महिलेवर

Mumbai News : मुंबईकरांना मोठा दिलासा! घाटकोपरमध्ये उभारला जाणार नवा केबल-स्टेड पूल, 2027 पर्यंत काम पूर्ण होण्याचे लक्ष्य

BMC News : तरंगता कचरा रोखण्यासाठी मालाडमध्ये 'द ओशन क्लीनअप' इंटरसेप्टर पायलट प्रकल्प!

तरंगता कचरा संकलन प्रकल्प पाहणीसाठी तेजिंदर सिंग तिवाना उतरले नदीपात्रात! मुंबई : मालाड (Malad) खाडीमध्ये जागतिक