Solapur Accident: पिकअप गाडी विहिरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू; परिसरात खळबळ!

सोलापूर : सोलापूरच्या माळशिरस मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पिकअप गाडी विहिरीत कोसळल्यामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जणांना स्थानिकांनी वाचवले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या पिकअप गाडीतील १४ जण सोलापूरच्या रांजणीगावचे स्थानिक होते. मिळालेल्या माहितीनुसार हे १४ जण देवदर्शनासाठी गेले होते. दर्शन करून घरी परत येताना ही घटना घडली आहे.





नेमकं घडलं काय ?


हा अपघात माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ झाला. या रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत हा अपघात झाला.विहिरीला कठडे नव्हते. तसेच ती काठोकाठ पाण्याने भरलेली आहे. याच विहिरीत भाविकांची पिकअप गाडी कोसळली. हा अपघात नेमका कसा घडला, हे अद्याप समजू शकलेले नाही. पण भरदिवसा ही अपघाताची घटना घडली आहे. संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न करणारी ही घटना आहे. या घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हे १४ जण म्हसवडमधील सिद्धनाथच्या दर्शनासाठी पिकअप गाडीने गेले होते. दर्शन करून परत येताना हा अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने १४ पैकी सहा जणांना वाचवण्यात यश आले आहे.





अपघाताबाबत मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया


या दुर्घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. "सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे वाहन विहिरीत पडून काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींवर उपचार सुरू असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच मृतांच्या वारसांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल," असे त्यांनी म्हटले आहे.
Comments
Add Comment

TET Paper Leak : टीईटी पेपरफुटी प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक मोठे यश मिळाले असून या प्रकरणात आणखी तीन जणांना अटक

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या

Onion Farmers : केंद्र सरकारकडून कांदा उत्पादकांना दिलासा

सरकारी खरेदीदरात १३ टक्क्यांनी वाढ; प्रति क्विंटल २ हजार १२५ रुपये दर निश्चित मुंबई : कांदा उत्पादक

Ratnagiri News : धक्कादायक! दिड वर्षांच्या चिमुकल्यासह आईने मारली मांडवी एक्सप्रेसमधून उडी

Ratnagiri News : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून एक (Ratnagiri News) अत्यंत धक्कादायक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे.

Jalna Bus Accident : जालना-बीड महामार्गावर भीषण अपघात! दोन एसटी बसची समोरासमोर धडक; चालकांसहअनेक प्रवासी जखमी

जालना : जालना-बीड महामार्गावर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. अंबड तालुक्यातील शहापूरजवळ गल्हाटी नदीच्या पुलावर