मनसेचे महापालिका गटनेते यशवंत किल्लेदार यांचा सवाल
मुंबई (विशेष प्रतिनिधी): सत्ताधारी आणि प्रशासन कितीही ओरडून सांगत असले की नाले सफाई शंभर टक्के झाली आहे. मात्र, मुंबई शहर आणि उपनगरातील बहुतांश नाल्यातील गाळ अद्याप काढलाच नसल्याचे विविध भागांमधील गाळ आणि कचऱ्याने भरलेली छायाचित्रेच प्रदर्शित करत यंदा मुंबईची तुंबई होणारच असल्याचा दावा केला आहे. नालेसफाई शंभर टक्के तर गाळ आाणि कचऱ्याने नाले तुडुंब भरलेले कसे असाही सवाल करतच त्यांनी पावसाला विलंब झाल्याने याची मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी, असे आवाहन केले आहे.
स्थायी समिती सदस्याने केली विचारणा समितीपुढे माहिती सादर करण्याची केली मागणी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील नोकर भरतीमध्ये आरक्षित ...
पावसाळा तोंडावर आला तरी नाले सफाई झाली असल्याचा दावा फोल ठरविणारे छायाचित्रे दाखवत मनसेचे महापालिका गटनेते, नगरसेवक यशवंत किल्लेदार यांनी शनिवारी जाहीर पत्रकार परिषदेत प्रशासनाच्या दाव्याची पोलखोल केली.मुंबईतील वडाळा, धारावी तसेच उपनगरातील भारत नगर, नाहूर गोवंडी, कुर्ला, पंचशील नगर अशोक नगर, क्रांती नगर - कुर्ला वाकोला, मानखुर्द, चेंबूर, मोगरा नाला, केशव पाडा नाला आदीं नाले गाळाने तसेच कचऱ्याने भरले असल्याचे फोटो बॅनरच्या माध्यमातून किल्लेदार यांनी दाखविले.
ज्यादिवशी सत्ताधारी नाले पाहणीकरिता जातात, त्या आधी महापालिकेचे अधिकारी ठेकेदारांना सूचित करतात. मग ते सर्व मशीनरी लावून तात्पुरता गाळ काढत असल्याचे दाखवतात. आम्ही सातत्याने पालिकेत या प्रश्नावर आवाज उठवायला जातो. पण मात्र आम्हांला बोलू दिले जात नाही, असे त्यांनी सांगितले.भाजपचेच सहकारी महापौरांची दिशाभूल करत आहेत. असे सांगत पावसाला विलंब झाला ही मोठी संधी आहे. या संधीचा फायदा घेऊन नाले सफाई त्वरित करावी असे आवाहन केले.
पुणे : यंदा पावसाळा लांबल्यामुळे आणि धरणसाठ्यात घट झाल्याने पुणे महापालिकेने पाणीपुरवठ्यात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (१५ ...
सध्या पाणी टंचाई जाणवत असल्याने पालिकेकडून १० टक्के पाणी कपात करण्यात आली आहे. कपात करणे हे ठीक आहे. मात्र पाण्याचा प्रेशर कमी का केला जातो? त्यामुळे इतर नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा प्रश्न उपस्थित नसल्याबाबतची नाराजी त्यांनी केली. मुंबईत जवळपास ७० टक्के रस्ते काँक्रिटीकरण झाले असतांनाही, सभागृहात खड्डे भरण्यासाठी प्रस्ताव मांडण्यात आला. जर रस्ते झाले, तर मग खड्डे भरण्याचा प्रस्ताव कशासाठी असा सवालही किल्लेदार यांनी यावेळी उपस्थित केला.





