Washim Crime News : पतीने पत्नीसह दोन मुलांना विहरीत ढकललं ; आणि नंतर स्वतःची गळफास लावून आत्महत्या

वाशिमच्या तिवळी गावात एक भयंकर घटना समोर अली आहे. बापाने आपल्या दोन पोटच्या मुलांसह बायकोचे हात बांधून विहिरीत ढकलले. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं.



वाशिमच्या तिवळी गावात एक कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. संतोष बकाल (35वर्ष) तो आपली पत्नी इंद्रायणी बकाल (28वर्ष) मुलगी जान्हवी बकाल (7वर्ष) आणि मुलगा सोहम बकाल (५ वर्ष) त्यांच्यासह तिवळी गावात राहत होत. खूप दिवसापासून पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. कौटुंबिक वादामुळे संतोष बकालने इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधून त्यांना विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतः महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले .



एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय इंद्रायणीच्या भावाला आणि नातेवाईकांना आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्याच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली असली तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं यावर भाष्य करणार असल्याचं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे आणि चौकशीसाठी संतोषचा भाऊ याला ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

Shaina NC : मुंबईतील सर्व धोकादायक झाडांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करा; शिवसेना राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन सी यांची मागणी

- चेंबूरमधील झाड पडून झालेल्या दुर्घटनेतील ११ वर्षीय विहान श्रीवास्तवच्या मृत्यूला जबाबदार असलेल्यांवर कारवाई

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसामुळे नावली गावातील काही भाग खचला

- प्रशासनाने केले नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; गावाला कोणताही धोका नाही - नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू

Mamata Banerjee : ममता बॅनर्जींना आणखी एक मोठा धक्का! निकटवर्तीय चंद्रिमा भट्टाचार्यांचा टीएमसीतील सर्व पदांचा राजीनामा; बंगालच्या राजकारणात खळबळ

कोलकाता : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर अडचणीत सापडलेल्या

Vaibhav Suryavanshi Debut : भारतीय संघात अखेर 'वैभव' पर्व सुरु! १५ व्या वर्षात पदार्पण करणारा पहिला भारतीय खेळाडू

- सचिन तेंडुलकर आणि स्मृती मंधानाला मागे टाकत रचला इतिहास भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच

Hardik Pandya : आयपीएल २०२७ पूर्वी मोठ्या ट्रेडची चर्चा! हार्दिक पांड्या CSK किंवा KKRमध्ये जाणार? सोशल मीडियावर खळबळ

मुंबई : आयपीएल २०२७ च्या आधी भारतीय क्रिकेटमधील स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मोठ्या

पंढरपुरात मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्या भक्तनिवासाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पंढरपूर : पंढरपूर येथे मंचर ग्रामस्थ वारकरी सेवा मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेल्या धर्मशाळा-भक्तनिवासाच्या