Washim Crime News : पतीने पत्नीसह दोन मुलांना विहरीत ढकललं ; आणि नंतर स्वतःची गळफास लावून आत्महत्या

वाशिमच्या तिवळी गावात एक भयंकर घटना समोर अली आहे. बापाने आपल्या दोन पोटच्या मुलांसह बायकोचे हात बांधून विहिरीत ढकलले. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं.



वाशिमच्या तिवळी गावात एक कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. संतोष बकाल (35वर्ष) तो आपली पत्नी इंद्रायणी बकाल (28वर्ष) मुलगी जान्हवी बकाल (7वर्ष) आणि मुलगा सोहम बकाल (५ वर्ष) त्यांच्यासह तिवळी गावात राहत होत. खूप दिवसापासून पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. कौटुंबिक वादामुळे संतोष बकालने इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधून त्यांना विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतः महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले .



एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय इंद्रायणीच्या भावाला आणि नातेवाईकांना आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्याच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली असली तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं यावर भाष्य करणार असल्याचं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे आणि चौकशीसाठी संतोषचा भाऊ याला ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

Daryapur Municipal Council : दर्यापूरच्या नगराध्यक्षांसह १९ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

- काँग्रेसला विदर्भात मोठा धक्का; आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश मुंबई : अमरावती जिल्ह्यातील

Water Resources Department : धरणांच्या काठी पर्यटनाला येणार नवा बहर

- 'जलसंपदा' आणि 'पर्यटन' विभागाचा संयुक्त उपक्रम; जायकवाडी, कोयना, उजनीसह १० प्रमुख धरणांचा समावेश मुंबई : अथांग

Maharashtra Police : राज्यातील ५ पोलीस अधिकाऱ्यांची राष्ट्रपती पदकासाठी निवड

मुंबई : पोलीस, कारागृह आणि नागरी संरक्षण दलात उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल दिल्या जाणाऱ्या

Samay Raina : समय रैनाला मोठा दिलासा; दिव्यांगांवरील असंवेदनशील टिप्पणीप्रकरणी सर्व एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

नवी दिल्ली : विनोदी कलाकार समय रैना याला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिव्यांग व्यक्तींविषयी

Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यातील वसतिगृहात सहा मुलींना सर्पदंश, NHRC ने घेतली दखल

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील एका आश्रम शाळेच्या वसतिगृहात अनुसूचित जमातीच्या सहा

MLA Sangram Jagtap : टिळा लावल्यामुळेच धर्मांध शक्तींकडून धीरज परदेशीची हत्या

- आमदार संग्राम जगताप; तपास वेगळ्या दिशेने नेण्याचा पोलिसांचा प्रयत्न मुंबई : अहिल्यानगर महापालिकेच्या विद्युत