Washim Crime News : पतीने पत्नीसह दोन मुलांना विहरीत ढकललं ; आणि नंतर स्वतःची गळफास लावून आत्महत्या

वाशिमच्या तिवळी गावात एक भयंकर घटना समोर अली आहे. बापाने आपल्या दोन पोटच्या मुलांसह बायकोचे हात बांधून विहिरीत ढकलले. एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण तिवळी गाव हळहळलं.



वाशिमच्या तिवळी गावात एक कुटुंब गुण्यागोविंदाने राहत होते. संतोष बकाल (35वर्ष) तो आपली पत्नी इंद्रायणी बकाल (28वर्ष) मुलगी जान्हवी बकाल (7वर्ष) आणि मुलगा सोहम बकाल (५ वर्ष) त्यांच्यासह तिवळी गावात राहत होत. खूप दिवसापासून पती आणि पत्नीमध्ये कौटुंबिक वाद सुरु होते. कौटुंबिक वादामुळे संतोष बकालने इंद्रायणीसह दोन्ही चिमुकल्या मुलांचे हात बांधून त्यांना विहिरीत ढकलले आणि नंतर स्वतः महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन जीवन संपवलं. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी मृतदेह बाहेर काढले. चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात आणले .



एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याने तिवळी गावासह जिल्हा हादरून गेला. मात्र हा अपघात नसून घातपात आहे असा संशय इंद्रायणीच्या भावाला आणि नातेवाईकांना आहे. संतोषचा भाऊ संपत्तीवरुन नेहमी संतोष आणि त्याच्या पत्नीसोबत वाद घालत मारहाण करत असल्याचा आरोप मृतक महिलेचा भाऊ सुधाकर इंगोले यांनी केल्याने प्रकरणाची गुंतागुंत वाढली असली तरी पोलिसांकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच नेमकं काय घडलं यावर भाष्य करणार असल्याचं सांगितलं. पुढील तपास सुरू आहे आणि चौकशीसाठी संतोषचा भाऊ याला ताब्यात घेतलं आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध, नीट पेपर लीक प्रकरणात केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाला महाराष्ट्राचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेपर लीक रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठुरायाचे रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक पोहोचले आहेत. हा आकडा

Narendra Modi : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे