Artificial intelligence (AI) : एआयने शोधली कंत्राटदारांची हातचलाखी

नालेसफाई कामांमध्ये कंपन्यांना ९.२५ कोटी रुपयांचा दंड


मुंबई : नाले स्वच्छतेच्या कामात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीच्या माध्यमातून शोधण्यात आलेल्या त्रुटींबाबत आणि निविदा अटी शर्तीनुसार यंत्रसामुग्री तैनात करण्याकामी झालेल्या विलंबाबाबत मुंबई महानगरपालिकेने कंत्राटदारांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. तसेच, संबंधित कंत्राटदारांना तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला आहे. ही दंडात्मक रक्कम कंत्राटदाराच्या देयकांमधून (Bill) वसूल करण्यात येत आहे. त्यामुळे AI ने कंत्राटदारांची हातचलाखी पकडल्याने आजवरच्या तुलनेत प्रथम प्रथमच पावसाळ्यापूर्वी केलेल्या कामांवर मोठ्याप्रमाणात दंडाची कारवाई केली आहे.


महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे (Ashwini Bhide) यांच्या निर्देशानुसार, पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने ही कारवाई केली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मार्चच्‍या पहिल्‍या आठवड्यात नाल्‍यांतून गाळ काढण्‍याची कामे वेगाने सुरू करण्‍यात आली. या नालेस्वच्छतेच्या कामांवर प्रभावी देखरेख ठेवण्‍याच्या सूचना महानगरपालिका आयुक्‍त आश्विनी भिडे यांनी यंत्रणेला दिल्या आहेत. गाळ काढण्याची कामे योग्यरित्या होण्यासह त्यावर देखरेख करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाने मागील वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून नाले स्वच्छतेच्या कामावर बारकाईने देखरेख ठेवली जात आहे. त्यानुसार, या कामांसाठी छायाचित्रण समवेत ३० सेकंदाचे चित्रीकरण (व्हिडिओ) बंधनकारक केले आहे. तर लहान नाल्यांमधून गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण करणे अनिवार्य केले आहे. गाळ उपसासंदर्भात प्राप्त होणाऱ्या सर्व व्हिडिओंचे महानगरपालिका प्रशासनाकडून कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने विश्लेषण केले जात आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे.



नालेसफाईच्या कामांमध्ये आवश्यक संयंत्रे, यंत्रसामग्री व वाहनांची अपुरी उपलब्धता, मनुष्यबळाची कमतरता, नाले स्वच्छतेचे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधनांचा पुरवठा न करणे, उपसलेल्या गाळावर विहित पद्धतीने प्रक्रिया न करणे तसेच कामे संथ गतीने करून निर्धारित वेळापत्रकाचे पालन न करणे, अशा विविध प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या आहेत.


ए. आय. आधारित तपासणी, डिजिटल पुराव्यांची पडताळणी आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी यामुळे कामांमधील त्रुटी वेळेत उघडकीस आल्याने संबंधित कंत्राटदारांवर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कामातील त्रुटीनुसार दंड रक्‍कम निश्चित करण्‍यात आली असून कंत्राटदारांच्‍या देय रकमेतून दंड रक्कम वसूल करण्यात येत आहे.


अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर म्हणाले की, नाले स्वच्छता कामांमध्ये एआय आधारित देखरेख आणि प्रत्यक्ष स्थळ तपासणी या दोन्ही यंत्रणांमुळे त्रुटी प्रभावीपणे उघडकीस आल्या आहेत. विशेषतः स्थळ तपासणी आणि व्हिडिओ अपलोड न करणे ही दंडात्मक कारवाईची प्रमुख कारणे ठरली. AI-आधारित आढळलेल्या त्रुटींद्वारे ८ कोटी ९९ लाख २६ हजार ८३० रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड याप्रकारे तब्बल ९ कोटी २५ लाख ७२ हजार ८३० रुपयांचा दंड ठोठावला असल्याचे अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे. या कारवाईचा उद्देश एकंदर नाले स्वच्छतेच्या कामकाजात गैरप्रकार खपून घेणार नाही, हा संदेश देणे हा असून यापुढेही जर काही त्रुटी आढळून आल्या तर महानगरपालिका प्रशासन टोकाची भूमिका घेईल,असेही नमुद केले.



अशाप्रकारे आकारली दंडाची रक्कम


मोठे नाले (१ कोटी ३९ लाख ३९ हजार ३८० रुपये)


लहान नाले (६ कोटी ११ लाख ८६ हजार ९५० रुपये)


मिठी नदी (१ कोटी ४८ लाख ५०० रुपये)


प्रत्येक त्रुटीयुक्त फेरीसाठी १ हजार रुपये प्रमाणे २६ लाख ४६ हजार रुपयांचा अतिरिक्त दंड

Comments
Add Comment

Prithviraj Chavan : पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्तपदी बढती, तर सहायक आयुक्तपदावरील आठ अधिकाऱ्यांची खांदेपालट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त डॉ पृथ्वीराज चौहाण यांची उपायुक्त

Devendra Fadnavis : कुंभमेळ्याआधी शिर्डी विमानतळावरील एअर कार्गो सुविधा सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; पुरंदर विमानतळासाठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी मुंबई : नवी मुंबई

Shambhuraj Desai : कोयना बॅक वॉटर फेस्टिव्हल २०२६ होणार जागतिक दर्जाचा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची घोषणा

मुंबई : महाराष्ट्राच्या पर्यटनाला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने कोयना बॅक वॉटर

Chandrashekhar Bawankule : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी पालघरमधील जमीन देण्याचा निर्णय

मुंबई : फडणवीस सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका' प्रकल्पाच्या कामाला गती

Nitesh Rane : मंत्री नितेश राणे यांनी घेतला वाढवण बंदर प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा

मुंबई : पालघर जिल्ह्यात केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त सहभागातून विकसित होत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी

Cashless Petrocard : राज्यातील रुग्णवाहिकांसाठी आता 'कॅशलेस पेट्रोकार्ड'

- आरोग्यमंत्र्यांचे हस्ते उद्घाटन; इंधनाच्या कारणांवरून होणारे रुग्णांचे हाल थांबणार मुंबई : "राज्यातील आरोग्य