धर्मशाला : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात धर्मशाळा येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या वनडे सामन्यात अफगाणिस्तानचा डाव 24.5 षटकांत 194 धावांवर आटोपला. पावसामुळे 25 षटकांच्या करण्यात आलेल्या या सामन्यात अफगाणिस्तानकडून रहमानुल्ला गुरबाजने 102 धावांची वादळी खेळी केली. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही . यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
गुजरात : गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय (SVPI) विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. तब्बल 4.26 कोटी रुपयांचे विदेशी सोने जप्त ...
गुरबाजचे वादळी शतक
अफगाणिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने इब्राहिम झद्रानला अवघ्या 1 धावेवर बाद केले. त्यानंतर अर्शदीप सिंगने अतल (0) आणि रहमत शाह (3) यांना माघारी धाडत अफगाणिस्तानची अवस्था 3 बाद अशी केली. मात्र यानंतर रहमानुल्ला गुरबाजने एकहाती लढा दिली. त्याने भारतीय गोलंदाजांवर हल्लाबोल करत केवळ 51 चेंडूत 102 धावा ठोकल्या. त्याच्या खेळीत 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.गुरबाजच्या आक्रमक फलंदाजीमुळे अफगाणिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र भारताने निर्णायक क्षणी सामन्यावर पकड मिळवली. नितीश कुमार रेड्डीने 16व्या षटकात गुरबाजला बाद करत भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळवून दिला. त्यानंतर हर्ष दुबेने अफगाणिस्तानचा कर्णधार हशमतुल्ला शाहिदी (27) याला बाद केले. या दोन विकेट्सनंतर अफगाणिस्तानची फलंदाजी पूर्णपणे कोलमडली. शेवटच्या 10 षटकांत त्यांनी केवळ 58 धावा करत 7 विकेट्स गमावल्या.
मेक्सिको : सध्याचा युरोपियन चॅम्पियन असलेला स्पेनचा संघ 'फिफा विश्वचषक २०२६' जिंकण्यासाठी सर्वात प्रबळ दावेदार आहे, अशी भविष्यवाणी एका नवीन ...
गुरनूर ब्रारची शानदार सुरुवात
भारताकडून पदार्पण करणाऱ्या गुरनूर ब्रारने 4.5 षटकांत 27 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. त्याला अर्शदीप, नितीश कुमार रेड्डी आणि हर्ष दुबे यांनी चांगली साथ दिली. यामुळे भारताला आफगाणिस्तानला १९४ वर ऑल आउट करण्यात यश आले.
भारतासमोर 195 धावांचे लक्ष्य
पावसामुळे 25 षटकांच्या करण्यात आलेल्या सामन्यात भारताला विजयासाठी 195 धावांचे लक्ष्य मिळाले आहे. कर्णधार शुभमन गिल, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर आणि केएल राहुल यांच्या फलंदाजीवर आता सर्वांच्या नजरा असतील.





