Nashik : रेशनकार्डधारकांना १५ जूननंतर धान्य मिळणार का ? तांत्रिक अडचणींमुळे संभ्रम वाढला

Nashik :  नाशिक जिल्ह्यातील लाखो रेशनकार्डधारकांसमोर (Ration card holder) सध्या एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. १५ जूननंतर रेशनचं धान्य मिळणार की नाही ? धान्य पुरवठ्यातील विलंब, ई-पॉस यंत्रणेतील तांत्रिक बिघाड आणि ग्रामीण भागातील वीज इंटरनेटच्या समस्येमुळे जिल्ह्यातील लाखो शिधापत्रिकाधारकांना (Ration Card Holders) धान्य मिळणार की नाही, याबाबत मोठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. १६ जूनपासून ई-पॉस प्रणाली बंद होणार असल्याने लाभार्थीकडे अवघे काही दिवस उरले आहेत.



संभ्रमाचे कारण काय ?


केंद्र सरकारने मे आणि जून महिन्यांचे अन्नधान्य १५ जूनपर्यंत ई-पॉस (e-PoS )यंत्रणेद्वारे वितरित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नाशिक जिल्ह्यात प्रत्यक्ष वितरण प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण झाल्याने लाभार्थ्यांची चिंता वाढली आहे. याआधी पावसाळा आणि साठवणुकीच्या अडचणी लक्षात घेऊन एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मे महिन्यात हमालांचा संप सुरु झाला. त्याची झळ धान्य वितरण प्रक्रियेला बसली. संपूर्ण प्रक्रियाच विस्कळीत झाली. परिणामी अनेक दुकानांपर्यंत धान्य पोहोचायलाच उशीर झाला.


स्थिती गंभीर असल्याने शासनाने मे महिन्याच्या धान्य वितरणासाठी १५ जूनपर्यंत मुदतवाढ दिली. मात्र, याच कालावधीत जून महिन्याचंही धान्य वाटप करण्याचे आदेश आल्याने रेशन दुकानदारांवर दुहेरी ताण निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात मे महिन्याचे सुमारे ७० टक्के वितरण पूर्ण झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत धान्य पोहोचवण्याचं मोठं आव्हान अजूनही कायम आहे.



१५ जून अंतिम मुदत


दरम्यान, ग्रामीण भागात सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असून अनेक नागरिक रोजगारासाठी गावाबाहेर जात आहेत. अनेकांना १५ जून ही अंतिम मुदत आहे, याची माहितीच नसल्याने मोठ्या संख्येने लाभार्थी धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच ई-पॉस यंत्रणेचा संथपणा, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील रेशनकार्डधारकांना धान्य मिळणार की नाही, याबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे. धान्य वितरणाची ही स्थिती असताना नवीन रेशनकार्ड मिळण्यात येणाऱ्या अडचणी ही रेशनकार्डधारकांसाठी डोकेदुखी झाली आहे.


नवीन रेशनकार्डसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागतो. आजही ग्रामीण भागात अनेकांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इतरांवर अवलंबुन राहावे लागते. ऑनलाईन अर्ज केल्यावरही रेशनकार्डासाठी कधी कधी तर वर्षभर वाट पाहावी लागत आहे. रेशनकार्ड मिळण्यास उशीर का होत आहे, याची चौकशी केल्यावर अनेक कारणे सांगितली जातात. पुन्हा अर्ज करण्यास सांगितले जाते. यामुळे शासनाने धान्य वितरणाची मुदत वाढवावी आणि रेशनकार्ड प्रक्रियेत सुलभता आणावी, अशी मागणी आता रेशनकार्डधारकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

T20 Series: झिम्बाब्वे दौऱ्यावर वैभव सूर्यवंशीसमोर इतिहास रचण्याची संधी; ११ षटकारांनी होऊ शकतो विश्वविक्रम

 T20 Series : इंग्लंड दौऱ्यात अपेक्षित कामगिरी करता न आल्याने युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आता झिम्बाब्वेविरुद्धच्या

Maharashtra Weather Update : पुढील ७२ तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे! पुणे रेड अलर्टवर, कल्याण-डोंबिवलीसह अनेक भागांत जोरदार पाऊस

मुंबई : महाराष्ट्रात पुढील ७२ तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा (Heavy to Extremely Heavy Rainfall) इशारा भारतीय हवामान विभागाने (India

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणात नवा खुलासा; 'प्लॅन A' फसला, मग रचला हत्येचा कट

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हत्या (Murder) प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पुण्याजवळील लोहगड (Lohgad

Iran-US War :ट्रम्प प्रशासनासमोर आर्थिक आव्हान; इराणसह युद्धासाठी नव्या निधीची गरज

Iran-US War : इराण-अमेरिका युद्ध (Iran-US War) पुन्हा तीव्र होत असताना अमेरिकेच्या संरक्षण खर्चात (Defense Spending) मोठी वाढ झाली आहे.

Mumbai Rain : मुंबईकरांनो सावधान! आज मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाचा 'यलो अलर्ट'

मुंबई : मुंबई (Mumbai) शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून बुधवारी (२३ जुलै) पावसाची

Maharashtra CM Devendra Fadnavis : महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार... मा.मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मंत्री नितेश राणे यांनी लिहिलेलं पत्र