नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी भारतीय राजकारणाच्या इतिहासात आणखी एक सुवर्णपान जोडले आहे. सलग ४,३९९ दिवस पंतप्रधानपद भूषवत त्यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांचा विक्रम मागे टाकत देशातील सर्वाधिक काळ सलग सेवा देणारे पंतप्रधान (Prime Minister) होण्याचा मान मिळवला आहे.
या ऐतिहासिक टप्प्यानंतर देश-विदेशातून पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या विशेष प्रसंगी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर (X) एक भावनिक आणि प्रेरणादायी संदेश शेअर करत “जनसेवा हीच सुशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे,” असे म्हटले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे भारताच्या इतिहासातील सर्वाधिक काळ सलग पदावर राहिलेले निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत. बुधवारी ...
‘जनसेवा हाच धर्म’; मोदींनी शेअर केला संस्कृत श्लोक
“सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते॥”
या सुभाषिताचा अर्थ स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, जो लोकप्रतिनिधी सेवा हाच आपला धर्म मानून सातत्याने जनहितासाठी कार्य करतो, सुशासनाद्वारे जनतेचे कल्याण आणि सुरक्षा सुनिश्चित करतो तसेच विनम्रता, संयम आणि कर्तव्यनिष्ठेने समाजाच्या विकासासाठी समर्पित राहतो, त्यालाच जनतेचा विश्वास, यश आणि समृद्धी प्राप्त होते.
जनसेवा ही सुशासन की सबसे बड़ी कसौटी है। विनम्रता, समर्पण और कर्तव्यनिष्ठा के साथ निरंतर कार्य करने वाला व्यक्ति ही जनविश्वास अर्जित करता है।
सदानुरक्तप्रकृतिः प्रजापालनतत्परः।
विनीतात्मा हि नृपतिर्भूयसी श्रियमश्नुते॥ pic.twitter.com/mn0Ax0F8hs
— Narendra Modi (@narendramodi) June 10, 2026
नेहरूंचा विक्रम मोडीत; ४,३९९ दिवसांचा सलग कार्यकाळ
नरेंद्र मोदी सध्या पंतप्रधान म्हणून सलग तिसऱ्या कार्यकाळात आहेत. त्यांनी ४,३९९ दिवसांचा सलग कार्यकाळ पूर्ण करत जवाहरलाल नेहरू यांच्या नावावरील विक्रम मागे टाकला आहे. नेहरूंचा १९५२ नंतरचा कार्यकाळ हा या तुलनेचा आधार मानला जातो, कारण १९४७ ते १९५२ या काळात ते अंतरिम सरकारचे प्रमुख होते.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi New Record) यांनी भारतीय राजकारणात आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सलग सर्वाधिक काळ देशाचे निवडून आलेले ...
सलग तीन लोकसभा विजय मिळवणारे पहिले पंतप्रधान
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही १४ वर्षांहून अधिक काळ देशाचे नेतृत्व केले होते, मात्र त्यांचा कार्यकाळ सलग नव्हता. नरेंद्र मोदी यांनी २०१४, २०१९ आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली आहे. त्यामुळे लोकशाही प्रक्रियेतून सलग तीन वेळा जनतेचा कौल मिळवून देशाचे नेतृत्व करणारे ते भारताच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान ठरले आहेत. पंतप्रधान मोदींच्या या ऐतिहासिक विक्रमाकडे भारतीय लोकशाहीच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिले जात आहे.