Bangalore : भारतीय संघाला अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेपूर्वी मोठा धक्का बसला आहे. पहिला विराट त्यानंतर आता हार्दिक पांड्या संघातून बाहेर झाल्याने संघला दुहेरी धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, मंगळवारी (९ मे) बीसीसीआयने हार्दिक पांड्याला फिट घोषित केले होते. बंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) मध्ये आठवडाभर फिटनेस टेस्ट आणि सराव केल्यानंतर त्याला खेळण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र शेवटच्या क्षणी दुखापत झाल्यामुळे तो आता संघातून बाहेर झाला आहे. तो आता पुनर्वसनासाठी (Rehabilitation) बंगळुरूमध्येच थांबणार आहे.(SPORTS)
आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम डेहराडून: उत्तराखंडमधील डेहराडून येथे महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजच्या त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू ...
शेवटच्या क्षणी दुखापत
सूत्रांच्या माहितीनुसार, हार्दिकने सुरुवातील सर्व फिटनेस चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या होत्या.पण ऐनवेळी त्याच्या क्वॉड्रिसेप्स (Quadriceps Strain -मांडीचे स्नायू) ला ताण झाल्यामुळे तो अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतून बाहेर झाला. बीसीसीआयने त्याला दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.हार्दिकच्या जागी संघात कोणाला स्थान मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच, जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याचा समावेश होईल की नाही ? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
रोहित शर्मा पूर्णपणे फिट
आफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी बीसीसीआयने रोहित शर्मा पूर्णपणे फिट असल्याचे सांगीतले आहे.मात्र विराट कोहली हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे या मालिकेला मुकणार आहे.तर त्याच्या जागी यशस्वी जयस्वालला संघात संधी देण्यात आली आहे.
इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आला आहे. लॉर्ड्स कसोटीत न्यूझीलंडवर शानदार ...
हार्दिक २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचा- अजित आगरकर
भारतीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी स्पष्ट केले की,हार्दिकला २०२७ च्या वर्ल्ड कपसाठी पूर्णपणे फिट ठेवणे हे भारतीय संघाचे मुख्य उद्दिष्ट आहे. म्हणूनच त्याला आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली होती. अजित आगरकर म्हणाले की, हार्दिक हा वनडे संघाचा जस्प्रीत बुमराह प्रमाणे महत्त्वाचा खेळाडू आहे. यामुळे त्याच्या फिटनेसवर आमचे मुख्य ध्येये आहे. म्हणूनच त्याला विश्रांती देत त्याच्या जागी नितीश रेड्डी सारख्या युवा खेळाडुला टी-२० संघात संधी देण्यात येईल.




