Thane : ठाण्यात कोरम मॉलसमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी

ठाणे : जून महिन्यातील नऊ दिवस झाले तरी पावसाला सुरुवात झालेली नाही. उकाड्याने नागरिक त्रस्त आहेत. ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. अशातच ठाण्यात कोरम मॉलसमोर जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली.


जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा मोठा फवारा उडाला. पाणी जवळच तयार होत असलेल्या मेट्रो लाईनपर्यंत पोहोचले. कोरम मॉलसमोर मोठे कारंजे सुरू झाले. पाण्याचा फवारा थेट मेट्रो लाईनच्या खांबांना आणि ट्रॅकला घासून वर उडत होता. यामुळे परिसरातील वाहतूक मंदावली.



आधीच ठाणेकर अपुऱ्या पाणीपुरवठ्याने त्रस्त आहेत. अशातच जलवहिनी फुटल्यामुळे आता ठाणेकरांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.


जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच ठाणे मनपाच्या अभियंत्यांनी घटनास्थळी पोहोचून दुरुस्तीचे काम सुरू केले. पण मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्यामुळे पाणीकपात अपरिहार्य आहे.


ठाण्याची दैनंदिन पाणी मागणी ५९० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) आहे. सध्या ५३ दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) तूट आहे. आता जलवाहिनी फुटल्यामुळे पाणी तूट वाढण्याची शक्यता आहे. यामुळे ठाणे मनपाने नागरिकांना पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन केले आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : 'शिवसेनेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ; राज्यभरातून प्रवेशाचा ओघ कायम'

नंदनवन निवासस्थानी विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश विकास, बाळासाहेबांचे विचार आणि

Congress : राज्यसभा निवडणूकीपूर्वीच काँग्रेसच्या एकमेव उमेदवाराचा अर्ज रद्द

भोपाळ : मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या एकमेव उमेदवार असलेल्या मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी

सरबजोत, लक्षिता, अखिल आणि साक्षीचा सुवर्णवेध

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी दावेदारी भक्कम डेहराडून: उत्तराखंडमधील डेहराडून येथे महाराणा प्रताप स्पोर्ट्स

POK : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये हिंसा

आंदोलक-सुरक्षा दल संघर्षात ३० ठार, २०० हून अधिक जखमी रावलकोट : पाकव्याप्त काश्मीरमध्ये सरकारविरोधी आंदोलनाला

एनडीए - २ परीक्षेचा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यूपीएससीचे सर्व्हर डाऊन

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’ आणि ‘नेवल अकॅडमी’

India-A vs Srilanka-A : दाम्बुलामध्ये भारताचा विजयी श्रीगणेशा, श्रीलंकेचा ८ धावांनी पराभव

दाम्बुला : सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (१०१ धावा) शानदार शतकी खेळीनंतर गोलंदाजांनी केलेल्या सांघिक आणि