Kalyan Power Cut : कल्याण ते बदलापूर वीजपुरवठा बंद; ‘या’ भागांत सकाळी ६ ते ११ पर्यंत शटडाऊन

कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामासाठी काही भागांत नियोजित वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्पासाठी महापारेषणची पडघा-मोहने १०० केव्ही वीजवाहिनी बंद ठेवण्यात येणार असल्याने हा वीजपुरवठा खंडित होणार आहे. महावितरणच्या कल्याण मंडळातील माहितीनुसार, सकाळी ६ ते ११ या कालावधीत कल्याण मंडळ क्रमांक १ आणि २ अंतर्गत विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील तसेच व्यावसायिक कामांचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



कुठे आणि किती वेळ वीज बंद?


टिटवाळा, मांडा, बल्याणी आणि अंबिवली रोड परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. तर खडकपाडा, बारावे, चिकणघर, रामबाग, कर्णिक रोड, पौर्णिमा चौक, रेल्वे हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात सुमारे पाच तासांचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे. याशिवाय योगीधाम, गौरीपाडा, शहाड, बिरला कॉलेज, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, कोकण वसाहत आणि संदीप हॉटेल परिसरावरही या नियोजित वीजखंडितचा परिणाम होणार आहे.



पाणीपुरवठ्यावरही परिणामाची शक्यता


वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे KDMCच्या बारावे आणि अटाळी पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. अटाळी, वडवली, अंबिवली आणि नेपच्युन परिसरातील नागरिकांनीही याची नोंद घ्यावी. दरम्यान, कात्रप, खरवाई, जुवेली, बदलापूर, बापसई, गोवेली, अंबरनाथ रेल्वे स्टेशन, कानसई आणि मोरीवली MIDC परिसरातही टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. नियोजित देखभाल आणि महामार्गाच्या कामासाठी हा वीजखंडित करण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वीज परत सुरू होण्याची वेळ संबंधित भागातील काम पूर्ण झाल्यानुसार बदलू शकते.

Comments
Add Comment

Major blow in the Iran conflict : अमेरिकेने गमावला ड्रोन ताफ्याचा चतुर्थांश भाग, ४५ 'एमक्यू-९ रीपर' नष्ट

इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिके

Ranveer Singh : रणवीर सिंगच्या ‘प्रलय’चे शूटिंग ऑस्ट्रेलियाऐवजी मुंबईत? दीपिकामुळे बदलल्याची चर्चा

मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता

IND vs SL Test : गॉलमध्ये टीम इंडियाची ‘फिरकी परीक्षा’; जयसूर्या-मेंडिस ठरणार मोठे आव्हान

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला १५ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला

Instagramचा १० वर्षांनंतर वर्डमार्क बदलला; ‘Instagzam’ म्हणत युजर्सची खिल्ली, तुम्हाला नवीन डिझाइन कसं वाटलं?

मुंबई : जगभरातील लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram ने जवळपास १० वर्षांनंतर आपल्या ब्रँडच्या लिखित ओळखीत

Devendra Fadnavis : भारताची जागतिक नेतृत्वाच्या दिशेने तर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित स्वागत समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

Brihanmumbai Municipal Corporation : पादचारी प्रथम अभियान; मुंबई महानगरपालिकेच्या ‘एफ दक्षिण’ आणि ‘एच पूर्व’ विभागाकडून कारवाई

मुंबई ( विशेष प्रतिनिधी) : पदपथ अडथळामुक्त करुन पादचाऱ्यांसाठी चालण्यायोग्य करण्याच्या अनुषंगाने, बृहन्मुंबई