कल्याण : कल्याण, डोंबिवली परिसरासह टिटवाळा, अंबरनाथ आणि बदलापूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवार, १४ ऑगस्ट रोजी वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवेच्या कामासाठी काही भागांत नियोजित वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) प्रकल्पासाठी महापारेषणची पडघा-मोहने १०० केव्ही वीजवाहिनी बंद ठेवण्यात येणार असल्याने हा वीजपुरवठा खंडित होणार आहे. महावितरणच्या कल्याण मंडळातील माहितीनुसार, सकाळी ६ ते ११ या कालावधीत कल्याण मंडळ क्रमांक १ आणि २ अंतर्गत विविध भागांत टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी घरातील तसेच व्यावसायिक कामांचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इराणसोबत सुरू असलेल्या संघर्षामुळे अमेरिकेच्या लष्कराला मोठे आर्थिक आणि सामरिक नुकसान सहन करावे लागत आहे. ...
कुठे आणि किती वेळ वीज बंद?
टिटवाळा, मांडा, बल्याणी आणि अंबिवली रोड परिसरात सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहण्याची शक्यता आहे. तर खडकपाडा, बारावे, चिकणघर, रामबाग, कर्णिक रोड, पौर्णिमा चौक, रेल्वे हॉस्पिटल आणि रुक्मिणीबाई रुग्णालय परिसरात सुमारे पाच तासांचा वीजपुरवठा खंडित राहणार आहे. याशिवाय योगीधाम, गौरीपाडा, शहाड, बिरला कॉलेज, इंदिरानगर, म्हाडा कॉलनी, कोकण वसाहत आणि संदीप हॉटेल परिसरावरही या नियोजित वीजखंडितचा परिणाम होणार आहे.
मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या आगामी ‘प्रलय’ या महत्त्वाकांक्षी चित्रपटाबाबत नवी माहिती समोर आली आहे. जय मेहता दिग्दर्शित हा सर्वनाश करणारा झोम्बी ...
पाणीपुरवठ्यावरही परिणामाची शक्यता
वीजपुरवठा बंद राहिल्यामुळे KDMCच्या बारावे आणि अटाळी पाणीपुरवठा पंपांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक प्रभावित होऊ शकते. अटाळी, वडवली, अंबिवली आणि नेपच्युन परिसरातील नागरिकांनीही याची नोंद घ्यावी. दरम्यान, कात्रप, खरवाई, जुवेली, बदलापूर, बापसई, गोवेली, अंबरनाथ रेल्वे स्टेशन, कानसई आणि मोरीवली MIDC परिसरातही टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. नियोजित देखभाल आणि महामार्गाच्या कामासाठी हा वीजखंडित करण्यात येत असल्याने नागरिकांनी आवश्यक ती पूर्वतयारी करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. वीज परत सुरू होण्याची वेळ संबंधित भागातील काम पूर्ण झाल्यानुसार बदलू शकते.