Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना (Thunderstorm), विजांचा कडकडाट (Lightning) आणि वेगवान वाऱ्यांसह (Strong Winds) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


यामध्ये कोकण विभागातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २, पश्चिम महाराष्ट्रातील ५, मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात.



कोकणात पावसाचा जोर वाढणार


कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टी (Coastal Area) परिसरात वाऱ्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.


उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना इशारा


उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके तसेच कृषी माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता


पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा आणि काही शहरी भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.



मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी


परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पेरणीपूर्व नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा अंदाज


विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही भागांत वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


या जिल्ह्यांना सध्या कोणताही अलर्ट नाही


दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अधिकृत Weather Alert जारी करण्यात आलेला नाही. मात्र, या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता

Yavatmal Murder Case : ‘गिफ्ट लवकरच पाठवतो’... स्टेटस ठेवला अन् घरात घुसून सपासप वार; तरुणाची निर्घृण हत्या

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारांचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच आणखी एका हत्येची घटना समोर आली

Navi Mumbai Airport Shivaji Maharaj Statue : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा भव्य पुतळा! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते १२ फूट उंच कांस्य अर्धपुतळ्याचे अनावरण

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य १२ फूट उंच कांस्य