Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा; घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात सतर्कतेचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम असून पुढील तीन दिवस काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर, कोकण आणि मराठवाड्यात नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Maharashtra Rain)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 7 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्रातील घाट भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच कोकण आणि गोव्यातही काही भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. (Weather Update)

मुंबई आणि उपनगरांमध्ये आज दिवसभर आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. शहराचे कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. (IMD)



8 ऑगस्ट रोजी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचाही अंदाज आहे. 9 ऑगस्टलाही या भागांमध्ये अशाच प्रकारचे हवामान कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. (Mumbai Rain)

दरम्यान, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानेही पावसाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला आहे. जानेवारी 2026 पासून आतापर्यंत राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून एकूण 1,698 अलर्ट जारी करण्यात आले आहेत. याशिवाय वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भात 285 विशेष इशारे देण्यात आले आहेत. ( Konkan Rain)

हवामान खात्याकडून मिळणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाइम अलर्टच्या आधारे स्थानिक प्रशासनाला वेळोवेळी सूचना दिल्या जात आहेत. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पूर आणि अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) यांची मिळून 23 पथके राज्यातील संवेदनशील भागांमध्ये तैनात करण्यात आली आहेत. आपत्कालीन परिस्थितीत त्वरित मदत आणि बचावकार्य करण्यासाठी ही पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत. (Heavy Rain)

 
Comments
Add Comment

Mumbai Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक बोगद्यात भीषण अपघात; फॉर्च्युनरचा अक्षरशः चुराडा, एकाचा मृत्यू

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक बोगद्यात शुक्रवारी भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे

Ladki Bahin Yojana : 'हा' तर लाडका निघाला ! अहिल्यानगरात ५२३ पुरुषांनी लाटले ७४.७५ लाख

Ladki Bahin Yojana : राज्य सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी सुरु केलेली लाडकी बहीण योजना अनेक महिलांसाठी मोठा आधार देणारी

Minister Nitin Gadkari : जळगाव बायपास प्रकरणी मोठी कारवाई ! नितीन गडकरींचे चौकशीचे आदेश, दोषी ठेकेदार होणार ब्लॅकलिस्ट

Minister Nitin Gadkari : सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील (Surat–Nagpur National Highway) पाळधी ते तरसोद बायपासच्या रेल्वे उड्डाणपूलाच्या

Radhakrishna Vikhe-Patil : मराठा जात प्रमाणपत्र रद्द प्रकरणावर सरकार अलर्ट! ‘जाणीवपूर्वक गैरप्रकार आढळल्यास कारवाई करू’ : राधाकृष्ण विखे-पाटील

संगमनेर : मराठा जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या काही घटनांवरून सुरू झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदा

State Government : राज्यातील १ लाख ६० हजार गोविंदांना १० लाखांचे विमा संरक्षण

अपघाती मृत्यू व अपंगत्वासाठी आर्थिक मदत; वैद्यकीय उपचारासाठी १ लाखांपर्यंतचे कवच मुंबई : दहीहंडी उत्सवाच्या

Jalgaon : दोघांचा अपघातात तर एकाचा तलावात बुडाल्याने मृत्यू , एकाच दिवशी तीन दुर्दैवी घटना घडल्याने जळगाव जिल्हा हळहळला

Jalgaon : जळगाव जिल्ह्यात बुधवारी घडलेल्या तीन वेगवेगळ्या दुर्घटनांनी जिल्हा हळहळला आहे. घडलेल्या दुर्घटनांमध्ये