Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे ३४१ वे वर्ष असून दोन्ही प्रमुख पालख्यांच्या प्रस्थानाच्या तारखा आणि मुक्कामांची माहिती निश्चित करण्यात आली आहे.


संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२६


जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी ७ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजता देहू नगरीतून पंढरपूरच्या दिशेने ऐतिहासिक प्रस्थान करणार आहे.



संत तुकाराम महाराज पालखीचे मुक्काम


- ७ जुलै २०२६ (पहिला मुक्काम): इनामदार वाडा, देहू (पिंपरी-चिंचवड)


- ८ जुलै २०२६ (दुसरा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर, आकुर्डी (पिंपरी-चिंचवड)


- ९ आणि १० जुलै २०२६ (तिसरा व चौथा मुक्काम): श्री निवडुंगा विठ्ठल मंदिर, नाना पेठ (पुणे शहर)


- ११ जुलै २०२६ (पाचवा मुक्काम): कदमवाक वस्ती, लोणी काळभोर – नवीन पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १२ जुलै २०२६ (सहावा मुक्काम): श्री भैरवनाथ मंदिर, यवत (पुणे ग्रामीण)


- १३ जुलै २०२६ (सातवा मुक्काम): श्री विठ्ठल मंदिर, वरवंड (पुणे ग्रामीण)


- १४ जुलै २०२६ (आठवा मुक्काम): उंडवाडी गवळ्याची, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १५ जुलै २०२६ (नववा मुक्काम): शारदा विद्यालय प्रांगण, बारामती (पुणे ग्रामीण)


- १६ जुलै २०२६ (दहावा मुक्काम): सणसर, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १७ जुलै २०२६ (अकरावा मुक्काम): निमगाव केतकी, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १८ जुलै २०२६ (बारावा मुक्काम): इंदापूर, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


- १९ जुलै २०२६ (तेरावा मुक्काम): सराटी, पालखी तळ (पुणे ग्रामीण)


संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०२६


दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा ८ जुलै २०२६ रोजी आळंदी येथून प्रस्थान करणार आहे. एकूण ३३ दिवसांच्या या भक्तिमय प्रवासानंतर पालखी ८ ऑगस्ट २०२६ रोजी पुन्हा आळंदीत परतणार आहे.



पुण्यातील मुक्कामाचा पेच अखेर सुटला


माऊलींच्या पुण्यातील मुक्कामावरून गेल्या काही दिवसांपासून संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी विठोबा मंदिरातील आवश्यक सुविधांबाबत लेखी हमी दिल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागला. झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत पुण्यातील मुक्काम भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातच होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे वारकरी आणि भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे सुरुवातीचे प्रमुख मुक्काम


- ८ जुलै २०२६ (पहिला मुक्काम): गांधी वाडा, आळंदी


- ९ आणि १० जुलै २०२६ (दुसरा व तिसरा मुक्काम): श्री विठोबा मंदिर, भवानी पेठ (पुणे शहर)


- ११ आणि १२ जुलै २०२६ (चौथा व पाचवा मुक्काम): सासवड (पुणे ग्रामीण)


- १३ जुलै २०२६ (सहावा मुक्काम): जेजुरी (पुणे ग्रामीण)


- १४ जुलै २०२६ (सातवा मुक्काम): वाल्हे (पुणे ग्रामीण)


- १५ जुलै २०२६ (आठवा मुक्काम): लोणंद (पुणे ग्रामीण)


- १६ जुलै २०२६ (नववा मुक्काम): तरडगाव (पुणे ग्रामीण)


विशेष म्हणजे, संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) आणि संत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dyaneshwar Maharaj) या दोन्ही पालख्यांचे ९ आणि १० जुलै रोजी पुणे शहरात मुक्काम असणार आहेत. नाना पेठ आणि भवानी पेठ परिसरात दोन दिवस भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळणार असून लाखो वारकरी आणि भाविकांची उपस्थिती अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्वागत, वाहतूक नियोजन आणि सुरक्षेसाठी व्यापक तयारी सुरू केली आहे.

Comments
Add Comment

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे

Pune Jagannath Rath Yatra 2026 : पुणेकरांनो अलर्ट! जगन्नाथ रथयात्रेमुळे उद्या 'या' प्रमुख रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन; घराबाहेर पडण्यापूर्वी मार्ग तपासा

पुणे : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, उद्या म्हणजेच रविवारी १९ जुलै रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रेनिमित्त शहरातील