मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना (Thunderstorm), विजांचा कडकडाट (Lightning) आणि वेगवान वाऱ्यांसह (Strong Winds) पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
यामध्ये कोकण विभागातील ३, उत्तर महाराष्ट्रातील २, पश्चिम महाराष्ट्रातील ५, मराठवाड्यातील ४ आणि विदर्भातील ११ जिल्ह्यांचा समावेश आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाच्या सरी कोसळू शकतात.
मुंबई : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी. रेल्वे प्रशासनाकडून देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी पश्चिम रेल्वे (Western Railway), हार्बर रेल्वे (Harbour Railway) आणि ...
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता असून किनारपट्टी (Coastal Area) परिसरात वाऱ्याचा वेग वाढू शकतो. त्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाण्यापूर्वी हवामानाचा अंदाज तपासण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांना इशारा
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू शकतात. शेतकऱ्यांनी काढणीस आलेली पिके तसेच कृषी माल सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठीही येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. घाटमाथा आणि काही शहरी भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मुंबई : मुंबईत सातत्याने पायाभूत सुविधांचे जाळे उभारले जात असले, तरी रस्त्यांवरील वाहतूक कोंडीची समस्या अद्याप सुटलेली नाही. यावर कायमस्वरूपी तोडगा ...
मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार सरी
परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्येही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. शेतकऱ्यांनी शेतीची कामे आणि पेरणीपूर्व नियोजन करताना हवामानाचा अंदाज लक्षात घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेचा अंदाज
विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या ११ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही भागांत वीज पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या जिल्ह्यांना सध्या कोणताही अलर्ट नाही
दरम्यान, पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांसाठी सध्या कोणताही अधिकृत Weather Alert जारी करण्यात आलेला नाही. मात्र, या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.






