स्पष्टवक्तेपणा या स्वभावामुळे मराठी कलाक्षेत्रात ज्या दोन व्यक्तींना प्रामुख्याने ओळखले जाते; त्या वक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यव्यवस्थापक अशोक मुळ्ये...! आता अशा दोन व्यक्ती एकाच व्यासपीठावर एकत्र आल्यावर काय होईल, याची खात्री कुणीच देऊ शकत नाही. पण असा एक योग अलीकडेच रसिकजनांच्या अलगद ओंजळीत आला. मात्र तिथे स्पष्टवक्तेपणाची बेरीज होत असताना, थेट प्रेमाचा झरा वाहू लागला आणि उपरोक्त स्वभाववैशिष्ट्यांच्या मागे लपलेल्या मनमिळावू स्वभावाचे दर्शन सर्वांना झाले. अफलातून संकल्पना प्रत्यक्षात राबवण्यात हातखंडा असलेले अशोक मुळ्ये हे नेहमी काहीतरी निमित्त शोधतच असतात आणि यावेळी त्यांच्या मनात आले की उषा नाडकर्णी यांचा ८० वा वाढदिवस साजरा करायचा. तसा त्यांनी तो केलाच; पण त्यानिमित्ताने तमाम रसिकवर्गाला उषा नाडकर्णी यांचे स्पष्ट विचार ऐकायला मिळाले. यातून त्यांचा सच्चा स्वभाव सर्वांनाच कळून चुकला.त्यांच्या याच मनोगताचा आढावा त्यांच्याच शब्दांत, खास 'राजरंग' कॉलमच्या वाचकांसाठी...
मुंबई : भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील सुपरस्टार मानल्या जाणाऱ्या वैभव सूर्यवंशीने आता नवा इतिहास रचला आहे.भारतीय क्रिकेट मंडळ म्हणजेच बीसाीसीआयने ...
"सर्व रसिक प्रेक्षकांना मी नमस्कार करते. खरे तर वाकून नमस्कार करायचा होता; पण वयामुळे वाकता येत नाही हो...! बोलून दाखवता येते मला; पण असे वाकता येत नाही. अशोकरावांनी मला फोन केला आणि मला सांगितले, "माझ्या वाढदिवसाचा सोहळा त्यांना करायचा आहे." मी म्हटले, "तू माझा सत्कार करशील आणि उगाच लोकांना वाईट वाटेल". त्यावर ते म्हणाले, "मी आहे ना; घाबरू नकोस. अजिबात कुणाची पर्वा करू नकोस". मी त्यांना म्हणाले, "मी कुणालाही घाबरत नाही. पण लोक पाठीमागे जे बोलतात ना, ते ऐकू येते आणि त्याचे खूप वाईट वाटते, म्हणून मी नको म्हणते." पण अशोक माझ्या भावासारखा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मी आले, त्याने माझा सत्कार केला. खरे सांगू का, घरी जर हा सोहळा केला असता तर इतके लोक माझ्या वाढदिवसाला आले नसते. कारण मी बोलवतच नाही कुणाला...! पण न सांगता, न ठरवता सगळे अशोकरावांच्या कार्यक्रमाला आले आणि त्यामुळेच मला इतके रसिक प्रेक्षक मिळाले.
हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या ...
हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या ...
हिवाळी अधिवेशनात नवा कायदा आणणार; लोकभावना लक्षात घेऊन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : राज्यातील देवस्थाने आणि मंदिरांच्या ...






