- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; 'संविधानविरोधी कृत्यांनी त्यांचा खरा चेहरा उघड केला'
मुंबई : "राजधानी दिल्लीतील जंतरमंतर येथे कॉकरोच जनता पार्टीने (सीजेपी) केलेले आंदोलन म्हणजे देशातील तरुणांची अभिव्यक्ती नसून, समाजात अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेचे प्रकटीकरण आहे. हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान घ्यायचे आणि त्याच संविधानाने तयार केलेली लोकशाही व्यवस्था व संस्था उखडून टाकण्याची भाषा करायची, या दुटप्पी आणि संविधानविरोधी कृत्यांनी या आंदोलकांचा खरा चेहरा आज देशासमोर उघडा पाडला आहे," अशा अत्यंत शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'सीजेपी'च्या आंदोलनाचा समाचार घेतला.
मुंबई : इराण-अमेरिका युद्धामुळे जागतिक इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, त्याचा परिणाम देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर झाला आहे. या ...
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे शनिवारी अमेरिकेतून भारतात परतताच थेट आंदोलनात सहभागी झाले. विमानतळावरून बाहेर पडताना हातामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आत्मचरित्र घेऊन त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत शासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी सुरू केली. जंतरमंतरवर मोठ्या संख्येने गोळा झालेल्या तरुणांसमोर आंदोलनादरम्यान झालेली भाषणे आणि दिल्या गेलेल्या घोषणांवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतून तीव्र आक्षेप नोंदवला.
या आंदोलनावर देशपातळीवरून उमटत असलेल्या तीव्र प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "संविधानाच्या प्रत्येक कलमामध्ये (आर्टिकल) या देशाच्या लोकशाहीची मूलतत्त्वे सामावलेली आहेत. जी व्यवस्था आणि ज्या संस्था संविधानाने निर्माण केल्या, त्यांनाच नाकारण्याचे मनसुबे जंतरमंतरवरील भाषणांमधून व्यक्त झाले आ
शिवराज्याभिषेक दिनी महावाणिज्यदूत यानीव रेवाच यांची घोषणा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केले पत्र मुंबई : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक ...