Crime News : तलाठ्याच्या आत्महत्येच्या घटनेत ट्विस्ट, बहिणीला रडत फोन केला अन... 'त्या' डायरीने गूढ वाढवलं

बीड : लग्नाला अवघे 12 दिवस झालेले असतानाच एका तरुण तलाठ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई (Ambajogai) शहरालगतच्या मोरेवाडी परिसरात घडली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. मृत गणेश दत्तू कोळी (Ganesh Dattu Koli) यांच्या आईच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीचे कथित बाहेरील संबंध आणि मानसिक छळामुळेच मुलाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप आईने केला आहे.



पतीसोबत राहण्यास नकार


फिर्यादीनुसार, विवाहानंतर कुलदैवताच्या दर्शनासाठी गेले असताना गणेशला पत्नीच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती सतत कोणाशी तरी फोनवर लपून बोलत असल्याचा संशय त्याला आला होता. दरम्यान, घरातील सत्यनारायण पूजेनंतर पत्नीने हे लग्न तिच्या इच्छेविरुद्ध झाल्याचे सांगत गणेशसोबत राहण्यास नकार दिला आणि ती अंबाजोगाईला परत गेल्याचे तक्रारीत नमूद आहे.


गणेश २४ मे रोजी पत्नीला भेटण्यासाठी मोरेवाडी, अंबाजोगाई येथे आला. २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत सांगितले की, पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले आहे. यावरून त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली असे नमूद आहे.




डायरीने गूढ वाढवलं


२४ मे रोजी गणेश पत्नीला भेटण्यासाठी अंबाजोगाईतील मोरेवाडी येथे गेला होता. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २५ मे रोजी त्याने आपल्या बहिणीला फोन करून रडत पत्नीचे दुसऱ्या तरुणासोबत संबंध असल्याचा संशय व्यक्त केला. पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असून तिने डायरीत तसे लिहून ठेवले आहे, जे त्याने वाचले, यावरून त्यांच्यात वाद झाला होता. असे त्याने बहिणीला सांगितले. त्यानंतर काही वेळातच गणेशने पत्नी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली. (Beed Crime News)



संशयाने घेतला जीव ?


मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पत्नी ड्युटीवर गेल्यानंतर गणेश घरात एकटाच होता. याच दरम्यान त्याने खोलीतील लोखंडी हुकाला दोरी बांधून गळफास घेत आत्महत्या (suicide) केल्याचे समोर आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला.




अवघ्या १२ दिवसांत संसार मोडला


गणेश कोळी यांनी २०२१ मध्ये राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई म्हणून सेवेला सुरुवात केली होती. नंतर त्यांनी तलाठी (Talathi) भरतीची तयारी करत २०२४ मध्ये चंद्रपूर (Chandrapur) येथे तलाठी पद मिळवले होते. १३ मे रोजी त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. गणेशची पत्नी अंबाजोगाई येथील फॉरेन्सिक विभागात कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.


या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. नवविवाहित जोडप्याच्या संसाराला अवघ्या १२ दिवसांत ग्रहण लागल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Maratha students : मराठा विद्यार्थ्यांना आता 'ओबीसी'प्रमाणेच शैक्षणिक सवलती

राज्य सरकारचा मोठा निर्णय; 'महाडीबीटी' पोर्टलवर होणार तांत्रिक बदल, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच

Buldhana Crime : शिर नसलेलं धड बघून सगळेच हादरले; शिवानी कळमेकर प्रकरणात नवे वळण

बुलढाणा : मागील महिन्यात शिवानी कळमेकर प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात गाजलं होत. भावाने आणि

Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग

ChandraShekar Bawankule : शासकीय जमीन हस्तांतरण, पुनर्विकासाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय Mumbai : शासकीय जमिनींची विक्री, हस्तांतर

Investment of Maharshtra : इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रात ४ हजार कोटींची गुंतवणूक

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार; ४ हजार ७५० रोजगार निर्माण होणार मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेचे

MPSC Nipun Setu : एमपीएससीच्या अंतिम निवडीत हुकलेल्या उमेदवारांना 'निपुण सेतू'द्वारे रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) विविध स्पर्धा परीक्षांच्या अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचूनही अंतिम