Raigad Crime: दागिन्यांच्या लालसेमुळे वृद्धेचा खून; मृतदेह आंबेनळी घाटाच्या दरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

रायगड : रायगड जिल्ह्यातील आंबेनळी घाटात अंगावर काटा आणणारी घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.अलिबाग तालुक्यातील 85 वर्षीय वृद्ध महिलेचे अपहरण करून गळा आवळून तिची हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह थेट आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकण्यात आला. ही हत्या महिलेच्या जवळच्या नातेवाईकांनीच केली आहे, असं पोलीस तपसात उघड झाले आहे.



मृत महिलेचे नाव सुनंदा लक्ष्मण पाटील (वय 85) आहे. त्या अलिबाग तालुक्यातील सारळ आदिवासीवाडी येथील रहिवासी होत्या. 31 मेपासून त्या बेपत्ता झाल्यानंतर नातेवाईकांनी मांडवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सुरुवातीला बेपत्ता प्रकरण म्हणून तपास सुरू करण्यात आला, मात्र पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक हत्याकांडाचा पर्दाफाश झाला. या प्रकरणी पोलिसांनी अनदर्श हिराजी शेडगे (वय ३२) आणि त्याचा साथीदार रितेश नरेश लोहार या दोघांनाही अटक केली आहे. आरोपी अनदर्श हा मृत महिलेचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे.



नेमकी हत्या का करण्यात आली ?


पोलिसांच्या माहितीनुसार, वृद्ध महिलेकडे असलेल्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर आरोपींची नजर होती. दागिने चोरण्याच्या उद्देशाने या दोघांनी ही हत्या केली . सर्वप्रथम त्यांनी सुनंदा पाटील यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने तिनविरा परिसरात नेऊन गळा आवळून हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकला. वृद्ध महिला बेपत्ता असल्याची तक्रार आणि तपासादरम्यान मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कट उलगडला.


पोलिसांचा तपास सुरू


मांडवा पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. दागिन्यांसाठी आपल्याच नातेवाईकाचा जीव घेणाऱ्या या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आंबेनळी घाटातील भीषण अपघातानंतर आता समोर आलेल्या या हत्याकांडाने परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Mumbai Local Train Crime : लोकलमधील किरकोळ वादाचं भीषण रूप; मध्यरात्री घडली धक्कादायक घटना

मुंबई : मुंबईच्या (Mumbai) लोकल ट्रेनमध्ये (Local Train) पुन्हा एकदा धक्कादायक गुन्ह्याची (Crime) घटना समोर आली आहे. मध्यरात्री

Devendra Fadnavis : सुमार कामगिरी करणाऱ्यांना मुख्यमंत्री देणार नारळ?

- मंत्रिमंडळात फेरबदलांचे संकेत; चांगले काम करणाऱ्या मंत्र्यांचे 'प्रमोशन' मुंबई : महायुती सरकारमध्ये सुमार

Chandrashekhar Bawankule : ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’साठी ९१ विधानसभा मतदारसंघांत 'सह अध्यक्षां'ची नेमणूक; महसूलमंत्री बावनकुळेंचा निर्णय

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या

Narendra Modi : सीईटीए' करारामुळे शेतकरी, उद्योजक आणि एमएसएमईंना नवी गती : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातील 'सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार' आणि ऐतिहासिक 'सामाजिक

Jaykumar Gore : सोलापूर-मुंबई विमानसेवा २ ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणार, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून २८ जून पासून बंद असलेली सोलापूर ते मुंबई विमानसेवा स्टार एअरलाईन कंपनीकडून २

PoK : पाकिस्तानी सैनिकांच्या गोळीबारात PoK मध्ये 12 नागरिकांचा मृत्यू

मुझफ्फराबाद : पाकिस्तानव्याप्त काश्मीर (POK)मध्ये सरकारविरोधी आंदोलन अधिक तीव्र झाले असून, मंगळवारी आंदोलक आणि