Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मृतांमध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा चांदे (३५), मुलगा जय चांदे (१०) आणि मुलगी पूर्वा चांदे (७) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी अनेक वर्षांपासून मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी चांदे कुटुंब गावाकडे आले होते. दीपक चांदे यांनी मेहनतीने गावात नवीन घर बांधले होते. घर पूर्ण झाल्यानंतर प्रथमच संपूर्ण कुटुंब काही दिवसांसाठी तेथे राहण्यासाठी आले होते. सुट्टी संपल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जाणार होते. त्याआधी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते.



मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाला.


घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोखाली अडकलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. अखेर जेसीबीच्या मदतीने टेम्पो बाजूला करून बचावकार्य करण्यात आले.


या दुर्घटनेमुळे चांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे

Comments
Add Comment

Jalgaon Railway : रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली; ‘कोयंबतूर–जयपूर’ एसी एक्स्प्रेस पुन्हा धावणार; जळगावकरांना रेल्वेचा दिलासा

Jalgaon Railway : जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोयंबतूर–जयपूर साप्ताहिक विशेष एसी

Dhule News : शिरपूर-चोपडा मार्गावर भीषण अपघात; दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

Dhule News : धुळे जिल्ह्यातुन एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील शिरपूर-चोपडा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात

Tiranga Rally : भाजप प्रत्येक जिल्ह्यात काढणार 'तिरंगा रॅली'

- ९ ते १७ ऑगस्टदरम्यान आयोजन; १० ऑगस्टला मुंबईत २५ हजार तरुणांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी होणार मुंबई :

Rickshaw-Taxi Driver : 15 ऑगस्टनंतर 'या' रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाईची शक्यता; मुदतवाढ मिळणार नाही

मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे मूलभूत ज्ञान अनिवार्य करण्याच्या निर्णयाची

Ahilyanagar : शेततळ्यात बुडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू; परिसरात हळहळ

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक मन हेलावणारी घटना घडली आहे. कोपरगाव तालुक्यातील बाहदराबाद

Pune News : हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक 100 हून अधिक NSG कमांडो, नेमकं काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील हिंजवडी आयटी (IT Park) पार्कमध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि नॅशनल सिक्युरिटी