Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मृतांमध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा चांदे (३५), मुलगा जय चांदे (१०) आणि मुलगी पूर्वा चांदे (७) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी अनेक वर्षांपासून मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी चांदे कुटुंब गावाकडे आले होते. दीपक चांदे यांनी मेहनतीने गावात नवीन घर बांधले होते. घर पूर्ण झाल्यानंतर प्रथमच संपूर्ण कुटुंब काही दिवसांसाठी तेथे राहण्यासाठी आले होते. सुट्टी संपल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जाणार होते. त्याआधी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते.



मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाला.


घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोखाली अडकलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. अखेर जेसीबीच्या मदतीने टेम्पो बाजूला करून बचावकार्य करण्यात आले.


या दुर्घटनेमुळे चांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे

Comments
Add Comment

Akanksha Chaturvedi Sucide : पेपरफुटीचा मानसिक धक्का; नागपुरातील NEET विद्यार्थिनीने संपवले आयुष्य

नागपूर : NEET परीक्षा पेपरफुटी (Paper Leak) प्रकरणामुळे नागपुरातील १८ वर्षीय विद्यार्थिनी आकांक्षा ऊर्फ स्नेहा

Wipro Office Religious Harassment : TCS नंतर आता विप्रोही वादाच्या भोवऱ्यात? धर्म बदलण्यास नकार दिल्याने नोकरी गमवावी लागली; पुण्यातील माजी कर्मचारीचा गंभीर आरोप

पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी

Shrirampur ATS Raid : पाकिस्तानी गँगस्टरच्या सोशल मीडिया नेटवर्कचा महाराष्ट्रात शिरकाव? श्रीरामपूरमध्ये ATS ची मोठी कारवाई, चार जण ताब्यात

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहरात मोठी कारवाई करत चार संशयितांना

Minister Makarand Jadhav-Patil : राज्यात नवे पुनर्वसन धोरण येणार

मंत्री मकरंद जाधव-पाटील; कालानुरूप सर्व बदल समाविष्ट करणार मुंबई : राज्यातील दरडप्रवण गावांचे कायमस्वरूपी

HSRP Number Plates : वाहनधारकांसाठी महत्त्वाची सूचना! ३० जूनपूर्वी HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य; अन्यथा कारवाईची शक्यता

राज्यातील लाखो वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ अंतर्गत सर्व शासकीय आणि

Shivrajyabhishek Sohala : शिवराज्याभिषेक सोहळ्यापूर्वी शिवभक्तांसाठी विशेष बससेवा सुरू; आता दादरहून थेट सांदोशीपर्यंत प्रवास करता येणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी दिलासादायक बातमी समोर आली