Kolhapur Accident : मुंबईला जाण्यासाठी निघाले पण त्याआधीच घडला भयंकर अपघात; एका क्षणात संपलं चौघांचं कुटुंब!

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur Accident) जिल्ह्यातील आजरा तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात (Road Accident) झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. उत्तुर-बहिरेवाडी मार्गावर दुचाकी आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले आहे. मृतांमध्ये दीपक चांदे (३९), त्यांची पत्नी शोभा चांदे (३५), मुलगा जय चांदे (१०) आणि मुलगी पूर्वा चांदे (७) यांचा समावेश आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, हे कुटुंब मूळचे आजरा तालुक्यातील असले तरी अनेक वर्षांपासून मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास होते. उन्हाळी सुट्टीसाठी चांदे कुटुंब गावाकडे आले होते. दीपक चांदे यांनी मेहनतीने गावात नवीन घर बांधले होते. घर पूर्ण झाल्यानंतर प्रथमच संपूर्ण कुटुंब काही दिवसांसाठी तेथे राहण्यासाठी आले होते. सुट्टी संपल्यामुळे ते दुसऱ्या दिवशी मुंबईला परत जाणार होते. त्याआधी नातेवाईकांना भेटण्यासाठी दुचाकीवरून दुंडगे गावाकडे निघाले होते.



मात्र, प्रवासादरम्यान त्यांच्या दुचाकीला समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की चौघांचाही घटनास्थळी मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी झाला.


घटनास्थळी अत्यंत हृदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. टेम्पोखाली अडकलेल्या दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. अखेर जेसीबीच्या मदतीने टेम्पो बाजूला करून बचावकार्य करण्यात आले.


या दुर्घटनेमुळे चांदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाताची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे

Comments
Add Comment

Ketan Agrawal Murder Case : 'खून मी नाही, त्याने केला!'... केतन अग्रवाल हत्याकांडात नवा ट्विस्ट; पोलिसही चक्रावले

Ketan Agrawal Murder Case : आधी कॉफी, मग कट? केतन हत्येपूर्वी सिया-चेतनची तासभर चर्चा

कॅफेत बसून रचला गेला होता प्लॅन? पुणे :  पुण्यातील लोहगड (Lohgad) किल्ल्यावर व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू (Death)

Nitesh Rane : मच्छिमारांच्या सुविधांसाठी दिघी जेट्टी प्रकल्प पावसाळा संपल्यानंतर तातडीने मार्गी लावा

मुंबई, : रायगड(raigad) जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील मौजे दिघी येथील मच्छिमार जेट्टी प्रकल्प तसेच परिसरातील गाळ

अवकाळी पावसाने बाधित शेतकऱ्यांना ३३४ कोटी ९८ लाख रुपयांच्या मदतीस मंजुरी

कोकणातील आंबा व काजू उत्पादकांना मोठा दिलासा मुंबई दि.  २५ : एप्रिल व मे २०२६ या कालावधीत राज्यातील विविध

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

शिवसेना महिला सेनेकडून मुंबई पोलीस आयुक्तांना निवेदन, कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई, दि. २५ जून

Ketan Agarwal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील 'एसआयटी' वादाच्या भोवऱ्यात

- तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी दिलेल्या आदेशांवर विरोधकांनी घेतला आक्षेप मुंबई : पुण्यातील तरुण व्यावसायिक