- शालेय वस्तूंची खरेदी निविदेची चौकशी करण्याची केली मागणी
- मुलांना वस्तूंचे वाटप वेळेत होऊ नये यासाठी काँग्रेसचा प्रयत्न
मुंबई (विशेष प्रतिनिधी)
मुंबई महापालिकेच्यावतीने शालेय वस्तू खरेदीतील प्रस्तापित कंत्राटदारांची मक्तेदारी मोडीत काढून महापोर्टल ऐवजी जेम पोर्टलद्वारे निविदा मागवण्याच्या भाजपच्या पावित्र्यामुळे काँग्रेसचा थयथयाट सुरु झाला आहे. या शालेय वस्तूंची खरेदी यापूर्वीच्या दराच्या तुलनेत कमी आणि चांगल्या दर्जाच्या मिळण्याची शक्यता असून या शालेय वस्तू उशिराने मिळणार असल्याचे कारण पुढे करत काँग्रेसने नाराजी व्यक्त करत या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारे शालेय मुलांना या वस्तू वेळेत मिळणार नाही यासाठी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न सुरु असल्याचे दिसून येत आहे.
- शुक्रवारी ५ जून २०२६ रोजी सकाळी ८ वाजता या उपक्रमाचा शुभारंभ - मुंबईकर नागरिकांनी या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून ...
सत्ताधारी पक्षाने पूर्वी दावा केला होता की जुनी खरेदी प्रक्रिया पारदर्शक नव्हती. त्यामुळे यापुढे सर्व खरेदी जेम पोर्टलमार्फत केली जाईल, ज्यामुळे दलाल संपतील, उत्पादकांना थेट संधी मिळेल आणि महानगरपालिकेला कमी दरात वस्तू मिळतील. परंतु प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. छत्री आणि रेनकोटच्या टेंडरमध्ये जास्त दर, कठोर अटी आणि पारदर्शकतेबाबत उपस्थित केलेले प्रश्न दुर्लक्षित करण्यात आले.
मात्र आजपर्यंत फक्त छत्री आणि रेनकोटचे टेंडर मंजूर झाले आहेत. इतर वस्तूंची प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. याचा फटका महानगरपालिका शाळांमध्ये शिकणाऱ्या लाखो गरीब विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्याचप्रमाणे शाळकरी मुलांच्या कल्याणासाठी होणारी खरेदी ही राजकीय नियंत्रण, जवळच्या लोकांना फायदा किंवा काही व्यावसायिक हितसंबंध साधण्यासाठी वापरली जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्याची परिस्थिती पाहता टेंडर प्रक्रियेत फेरफार झाल्याचा संशय निर्माण होतो. यामुळे स्पर्धा कमी होऊ शकते, वस्तू महाग दराने खरेदी केल्या जाऊ शकतात आणि महानगरपालिकेला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होऊ शकते.
पुणे : नाशिकमधील TCS कार्यालयात कथित धार्मिक छळ आणि धर्मांतराच्या दबावाच्या आरोपांनंतर आता पुण्यातील आयटी कंपनी विप्रोबाबतही एक गंभीर प्रकरण समोर आले ...
त्यामुळे आम्ही सर्व शालेय खरेदी टेंडरची सखोल चौकशी करावी. तसेच एकाच पात्र बोलीदाराला करार का देण्यात आला याची तपासणी करावी. निवडलेल्या कंपन्या सर्व पात्रता निकष पूर्ण करतात का हे पडताळावे. तांत्रिक तपासणीदरम्यान काही कंपन्यांना अपात्र ठरवण्यामागील कारणांची चौकशी करावी. अशी मागणी त्यांनी केली.





