उपमहापौर संजय घाडी यांनी केली कुर्ला भागातील नाल्यांची सफाई
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रेल्वे हद्दीतील नाल्यांच्या स्वच्छतेसंदर्भात रेल्वे प्रशासन, महानगरपालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयातून आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. पावसाळ्याच्या संपूर्ण कालावधीत नालेस्वच्छता कामांवर सातत्याने देखरेख ठेवली जाईल आणि नागरिकांना कोणतीही अडचण भासल्यास तातडीने त्यावर कार्यवाही केली जाईल, असेही उपमहापौर संजय घाडी यांनी स्पष्ट केले.
मुंबई: मागील आठवड्यात पुणे शहरामध्ये घडलेल्या विषारी दारु दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर विविध अवैध हातभट्टी निर्मिती व विक्री केंद्राविरुध्द कारवाई ...
मुंबईचे उप महापौर संजय घाडी यांनी बुधवारी ३ जून २०२६ रोजी कुर्ला (पूर्व) परिसरातील लोकमान्य टिळक टर्मिनस नाला, नेहरू नगर नाला, शिवसृष्टी नाला आणि राहुल नगर नाला येथे सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यात स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर, परिमंडळ ५ च्या उप आयुक्त संध्या नांदेडकर, ‘एल’ विभागाचे सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर तसेच संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पुणे : पुणे पोलिसांनी पुणे, दिल्ली, कुरकुंभ आणि सांगली परिसरात धाडी टाकून तब्बल ३ हजार ७०० कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केल्यानंतर, आता या प्रकरणाचे ...
उप महापौर घाडी म्हणाले की, नालेसफाईची कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून पहिल्या टप्प्यातील कामे समाधानकारकरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. नाल्यांमध्ये वारंवार साचणारा तरंगता कचरा आणि गाळ नियमितपणे हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा प्रवाह कायम राखण्यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.
पुणे : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार आणि खून प्रकरणाच्या खटल्यात एक मोठी घडामोडी समोर आली आहे. घटनेच्या वेळी घटनास्थळी ...
पाहणीदरम्यान उप महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना नाल्यांमधील गाळ व कचरा वेळेत उचलण्याच्या, पाण्याचा प्रवाह सुरळीत राखण्याच्या तसेच आवश्यक ठिकाणी अतिरिक्त स्वच्छता मोहीम राबवावी. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ‘मॅनहोल’ सुरक्षितरीत्या बंद ठेवण्यावर भर द्यावा, अशा विविध सूचना केल्या.
स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी प्रशासनाच्या समन्वयातून नाले स्वच्छतेची कामे अधिक गतीने पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येत असल्याचे सांगितले.उप महापौर घाडी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सूचना जाणून घेतल्या तसेच नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन केले. स्वच्छ आणि जलभरावमुक्त मुंबईसाठी प्रशासन आणि नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले.





