- आचारसंहितेचा अडथळा दूर; 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजने'ला मंजुरीची शक्यता
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शेतकरी कर्जमाफी (Farmer Loan Waiver) योजनेला आचारसंहितेच्या अटींमधून विशेष सवलत दिल्यानंतर, आज (मंगळवार) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. (Cabinet Meeting)
दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज; नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, पुण्यात कुरघोड्या मुंबई : राज्यातील प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या स्थानिक ...
अर्थसंकल्पातील घोषणेनुसार, या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी (Farmer Loan Waiver) दिली जाणार आहे. तर दुसरीकडे, बँकेचे कर्ज नियमितपणे परतफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ५० हजार रुपयांचे विशेष अनुदानही दिले जाणार आहे. या दोन्ही घटकांना एकाच वेळी लाभ देण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. (Cabinet Meeting)






