No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी एक अत्यंत धाडसी आणि मोठा निर्णय घेतला आहे. विठ्ठलवाडी वाहतूक उपविभागाच्या हद्दीत येणाऱ्या आणि नेहमी वाहनांची प्रचंड वर्दळ असणाऱ्या ५ प्रमुख रस्त्यांवर आता २४ तास 'नो-पार्किंग' लागू करण्यात आली आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना ठाणे वाहतूक पोलिसांकडून जारी करण्यात आली असून, यामुळे वाहनधारकांना आता अधिक शिस्त पाळावी लागणार आहे.



अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी




ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर पूर्व भागातील अनेक मुख्य रस्त्यांवर वाहनचालकांकडून रस्त्याच्या कडेला अनधिकृत आणि अस्ताव्यस्तपणे गाड्या पार्क केल्या जात होत्या. ही बेकायदेशीर पार्किंग वाहतुकीसाठी मोठा अडथळा ठरत होती. यामुळे या संपूर्ण परिसरात दिवसभर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६(१)(अ)(ब) अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून हा निर्णय घेतला आहे.



'या' ५ प्रमुख रस्त्यांवर लागू असणार २४ तास बंदी :



१. भीम कॉलनी परिसर (उल्हासनगर ४) :


येथील प्रसिद्ध गुलशन ज्यूस सेंटर आणि सत्कार बार अँड रेस्टॉरंटसमोरील मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना सुमारे २०० मीटरच्या परिसरात २४ तास पार्किंगला पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. येथे आता कोणतेही वाहन उभे करता येणार नाही.


२. क्रिभाणा डेअरी मार्ग :


क्रिभाणा डेअरीकडून पांडुरंग बँड पार्क आणि तिथून पुढे थेट सॅक्सार चर्चपर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा यात समावेश आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूंच्या सुमारे ३०० मीटर अंतरापर्यंत वाहन उभे करण्यास कायदेशीर मनाई करण्यात आली आहे.


३. सत्यम सुपर मार्केट परिसर :


बालाजी ताडी माडी सेंटर ते सत्यम सुपर मार्केट शॉप या दरम्यानचा रस्ता अत्यंत गजबजलेला असतो. त्यामुळे या परिसरातील दोन्ही बाजूंना सुमारे ५० मीटर अंतराच्या क्षेत्रात २४ तास नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला आहे.


४. उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन मार्ग :


चंद्रमणी बुद्ध विहारसमोरील रामेश्वर महादेव मंदिरापासून ते थेट उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशनपर्यंतचा सुमारे ३०० मीटरचा रस्ता आता नो-पार्किंग अंतर्गत येईल. या रस्त्यावर आधीच स्कायवॉकचे पिलर्स (खांब) असल्यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला आहे. त्यात गाड्या पार्क केल्यामुळे स्टेशन परिसरात भीषण कोंडी होत असे, म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.


५. मद्रासी पाडा मार्ग :


चंद्रमणी बुद्ध विहार ते मद्रासी पाडा आणि तिथून पुढे थेट मरी माता मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा यात समावेश आहे. या मार्गावरील दोन्ही बाजूंना सुमारे १०० मीटर अंतराच्या रस्त्यावर दिवसभर आणि रात्रभर पार्किंग करण्यास सक्त मनाई असेल.



३० दिवसांची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी


वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे की, हा नवा नियम सध्या ३० दिवसांसाठी प्रायोगिक तत्त्वावर (Trial Basis) लागू करण्यात येत आहे. या काळात स्थानिक नागरिक, व्यापारी किंवा वाहनचालकांना या निर्णयावर काही आक्षेप घ्यायचा असेल किंवा काही चांगल्या सूचना मांडायच्या असतील, तर त्यांनी लेखी स्वरूपात 'पोलीस उपआयुक्त कार्यालय, वाहतूक शाखा, तीन हात नाका, एल.बी.एस. मार्ग, ठाणे' येथे आपले अर्ज सादर करावेत. ३० दिवसांच्या या कालावधीत जर कोणत्याही वैध हरकती आल्या नाहीत, तर हा नो-पार्किंगचा निर्णय कायमस्वरूपी लागू केला जाईल.



'या' अत्यावश्यक सेवांच्या वाहनांना नियमातून सूट


वाहतूक पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हा नो-पार्किंगचा नियम सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांसाठी असेल. परंतु, आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता पोलीस वाहने, अग्निशामक दलाच्या गाड्या, रुग्णवाहिका, ऑक्सिजन वाहून नेणारी वाहने आणि इतर शासकीय अत्यावश्यक सेवांच्या गाड्यांना या नियमातून पूर्णपणे वगळण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Nashik Bus Fire News : धावत्या एसटीला भीषण आग; चालक-वाहकाच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचे प्राण वाचले

Nashik Bus Fire News : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Agra National Highway) चांदवडजवळील रेणुकादेवी घाटात मंगळवारी दुपारी एक मोठी

Cabinet Minister Mangalprabhat Lodhan : गिरगावकरांना दिलासा मिळेपर्यंत वीजपुरवठा समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा केला जाईल

वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास नगरसेविका सौ स्नेहल तेंडुलकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा मुंबई : गिरगाव परिसरात

PM SVANidhi Yojana: : पीएम स्वनिधी योजनेला ६ वर्षे पूर्ण, हजारो लोक घेत आहेत फायदा ; योजना नक्की आहे तरी काय ?

PM SVANidhi Yojana : पीएम स्वनिधी योजना केंद्र सरकारच्या महत्त्कांक्षी योजनांपैकी एक आहे. या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली

IND vs AFG Test : टीम इंडियात मोठा ट्विस्ट! 60 विकेट्स घेणाऱ्या आकिब नबीला BCCI ने दिली संधी; प्लेइंग-११ मध्ये उलथापालथ

Mumbai : अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या निवडीवरून वाद निर्माण झाला होता. रणजी

Cabinet decision : ग्रामीण रस्ते आणि पायाभूत सुविधांना बूस्टर

 'मुख्यमंत्री ग्राम सडक योजने'साठी ६ हजार ४२९ कोटी; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय मुंबई : राज्यातील ग्रामीण संपर्क

Nashik : दीक्षांत सोहळ्यात प्रेमाचे रंग, वैमानिकाचे हेलिकॉप्टर पुढे भन्नाट प्रपोज

Nashik : प्रेम म्हटलं की प्रपोज करणं आलं. पण प्रपोज करण्याची पद्धत आगळीवेगळी असेल तर चर्चा होतेच. नाशिक येथील 'कॉम्बॅट