Monsoon 2026 : दिलासादायक! येत्या ४८ तासांत केरळमध्ये पाऊस बरसणार; महाराष्ट्रासह 'या' राज्यांना पाऊस झोडपणार! IMD चा अंदाज काय ?

मुंबई : उन्हाच्या तीव्र झळा आणि असह्य उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी अखेर एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित नैऋत्य मान्सून (Monsoon Alert)  (Monsoon 2026) आता अगदी उंबरठ्यावर येऊन पोहोचला असून, येत्या ४८ तासांत म्हणजेच ४ जूनच्या आसपास तो केरळमध्ये अधिकृतपणे दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी सध्या देशात अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. केरळसह लक्षद्वीप आणि तामिळनाडूच्या आणखी काही भागांमध्ये मान्सूनची आगेकूच वेगाने सुरू असून, लवकरच पावसाचा वर्षाव सुरू होईल.



अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनची जोरदार घोडदौड


हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की, मान्सूनचा प्रवास आता केवळ केरळ पुरता मर्यादित राहिलेला नाही. अरबी समुद्राच्या नैऋत्य आणि आग्नेय भागात मान्सूनने आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे, बंगालच्या उपसागरातील पश्चिम-मध्य, पूर्व-मध्य आणि ईशान्य भागांतही मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागांमध्येही ४ जूनपर्यंत मान्सूनचे ढग दाटून येतील. हवामान खात्याने मंगळवारी जारी केलेल्या पत्रकानुसार, अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागरापर्यंत मान्सूनचा विस्तार होण्यासाठी परिस्थिती पूर्णपणे पोषक आहे.



केरळ आणि कर्नाटकात 'ऑरेंज अलर्ट'


मान्सूनच्या आगमनासोबतच दक्षिण भारतात पावसाचा जोर प्रचंड वाढणार आहे. आयएमडीच्या (IMD) अंदाजानुसार, पुढील ६ ते ७ दिवसांत केरळमध्ये विखुरलेल्या स्वरूपात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळू शकतो. काही भागांत ७ ते २० सेंटीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. केरळच्या सोबतीनेच तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यांतही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या संपूर्ण आठवड्यात उत्तर-पश्चिम, मध्य, पूर्व भारत आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताच्या काही भागांमध्ये ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहतील आणि मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट पाहायला मिळेल.



'टायफून' आणि चक्रीय वाऱ्यांमुळे मान्सूनच्या सुरुवातीला ब्रेक ?


आयएमडीच्या 'विस्तारित श्रेणी अंदाजा'नुसार (Extended Range Forecast), २८ मे ते ४ जून या काळात केरळमध्ये प्रामुख्याने हवामान कोरडे राहिले होते आणि ४ जूननंतर त्यात अतिशय संथ गतीने सुधारणा होईल. या संथ गतीमागे एक मोठे जागतिक हवामान बदलाचे कारण आहे. सध्या पश्चिम पॅसिफिक महासागरावर एक तीव्र 'टायफून' सक्रिय आहे. हे वादळ अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प (Ocen Moisture) मोठ्या प्रमाणात स्वतःकडे खेचून घेत आहे. त्यातच लक्षद्वीप क्षेत्रावर निर्माण झालेल्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थितीमुळे (Cyclonic Circulation) मान्सूनचे आगमन काहीसे उशिरा झाले असून, त्याची सुरुवातीची वाटचाल कमकुवत राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.



यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता


आनंदाच्या बातमीसोबतच हवामान खात्याने एक चिंताजनक आकडेवारीही जाहीर केली आहे. गेल्या आठवड्यात भारतीय हवामान विभागाने (IMD) आपल्या हंगामी पर्जन्यमानाच्या अंदाजात सुधारणा करत तो खाली आणला आहे. एप्रिल महिन्यात जाहीर केलेल्या 'दीर्घकालीन सरासरीच्या' (LPA) ९२ टक्क्यांवरून हा अंदाज आता ९० टक्क्यांवर आणण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, यंदा पावसाळ्यात 'पावसाची तूट' (Deficient Monsoon) असण्याची शक्यता तब्बल ६० टक्के आहे. एकूण पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा कमी' (Below-Normal) राहण्याची शक्यता ५० टक्क्यांहून अधिक असल्याने, शेतकऱ्यांना आणि प्रशासनाला पाण्याचा वापर अत्यंत नियोजित पद्धतीने करावा लागणार आहे.

Comments
Add Comment

Monsoon in Jalgaon : पावसाची ९२ टक्के तूट; पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात मान्सूनच्या आगमनाने मोठी ओढ दिल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान

Weather Station : प्रत्येक गावात वेदर स्टेशन बसवण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार : कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई : फळपीक विमा योजनेतील शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची अचूक भरपाई मिळवून देण्यासाठी राज्यातील प्रत्येक

Beed Murder Case: धक्कादायक! भांडण सोडवायला गेला आणि जीव गमावून बसला

बीडमध्ये हॉटेल चालकाची हत्या Beed Murder Case : बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज तालुक्यात एका २५ वर्षीय हॉटेल चालकाची चाकूने

Devendra Fadnavis : ९७ हजार ७०६ कोटींच्या पुरवणी मागण्या सादर

 फडणवीस सरकारचा नवा विक्रम; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी २० हजार ७५२ कोटींची तरतूद मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या

Ambenali Ghat: २०० फूट दरीत कोसळलेल्या तरुणाला मिळाली 'नवसंजीवनी'; स्थानिक ट्रेकर्सचे धाडसी ऑपरेशन!

महाबळेश्वर (सातारा) : निसर्गाच्या कुशीत वसलेल्या आणि घनदाट जंगलासाठी ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या आंबेनळी

Devendra Fadnavis : महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा देणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा होणार मुंबई : "राज्य विधिमंडळाचे सोमवारपासून