MIDC : मृत मराठा आंदोलकांच्या वारसांना आता एमआयडीसीत नोकरी

जिल्हाधिकाऱ्यांना वारसांच्या पडताळणीचे निर्देश; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी


मुंबई : मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या आंदोलनातील मृतांच्या पात्र वारसांना आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (एमआयडीसी) नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या अनुषंगाने प्रक्रियेला गती देत, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आपापल्या जिल्ह्यातील मृत आंदोलकांच्या वारसांची तातडीने कायदेशीर पडताळणी करून त्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.



यापूर्वी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील मृतांच्या वारसांना राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याची तरतूद करण्यात आली होती. याच धर्तीवर आता 'एमआयडीसी'मध्येही मृत आंदोलकांच्या एका वारसाला अनुकंपा तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जाईल. राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांना यासंदर्भात आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी आता प्रशासकीय पातळीवर वेगवान हालचाली सुरू झाल्या असून सामान्य प्रशासन विभागाने (जीएडी) या संदर्भातील विशेष परिपत्रक सर्व जिल्हाधिकाऱ्यांना जारी केले आहे.



सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशानुसार, एमआयडीसीत अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्यासाठी मृत आंदोलकांच्या वारसांची पडताळणी अत्यंत काटेकोर आणि अचूक असणे आवश्यक आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील मृतांच्या वारसांची तातडीने, गतिमान आणि योग्य ती शहानिशा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर संपूर्ण चौकशी व तपासणी करून पात्र ठरलेल्या वारसांना अधिकृत प्रमाणपत्र वितरित करावे, जेणेकरून त्यांना एमआयडीसीमधील नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. ही सर्व प्रक्रिया विहित मुदतीत आणि प्राधान्याने राबवण्याच्या सूचनाही सरकारने प्रशासनाला दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Local News : लोकलमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या पुरुषाला १२ तासांत अटक

मुंबई : लोकलमध्ये महिलेला मारहाण करत असलेल्या पुरुषाचा व्हिडीओ व्हायरल झाला. हा व्हिडीओ व्हायरल होताच अवघ्या १२

Jalna : कॉलेजचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू आणि चौघे जखमी

जालना : जालना जिल्ह्यातील भोकरदनमध्ये एका कॉलेजच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम सुरू असताना

Weather changes in Maharashtra : महाराष्ट्रात पुन्हा बदलले हवामान; शनिवारी अनेक भागांत पावसाचा अंदाज, ७ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मुंबई : महाराष्ट्रामध्ये मान्सूनचे वारे पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, राज्याच्या विविध भागांत पावसाचा जोर

Boss Scam : अधिकारी बनून पैशांची मागणी; 'बॉस स्कॅम'पासून सावधान राहण्याचे केंद्राचे आवाहन

नवी दिल्ली : व्हॉट्सॲप, ई-मेल किंवा इतर संदेशवहन माध्यमांचा वापर करून आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर

New IT Rules : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नवीन आयटी नियम कठोर, आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची मुदत २४ तासांवरून थेट २ तासांवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी आक्षेपार्ह आणि संवेदनशील मजकूर हटवण्याच्या मुदतीत

PM Modi and Sukhbir Singh Badal Meeting : पंतप्रधान मोदी आणि सुखबीर सिंग बादल यांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी माजी मित्रपक्ष असलेल्या भारतीय जनता पक्ष (भाजप)