ED Director Satyavrat Kumar : नीरव मोदी ते नवाब मलिक प्रकरणांचे तपासकर्ते; ईडीचे वरिष्ठ अधिकारी सत्यव्रत कुमार यांची अचानक स्वेच्छानिवृत्ती

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अनेक गाजलेल्या आणि हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास करणारे विशेष संचालक सत्यव्रत कुमार (ED Director Satyavrat Kumar) यांनी सेवेत तब्बल ११ वर्षांचा कालावधी शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या अनपेक्षित निर्णयामुळे प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून, त्यांनी अचानक निवृत्ती का स्वीकारली याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (ED Director Satyavrat Kumar)


भारतीय महसूल सेवेच्या (IRS) २००४ च्या तुकडीतील अधिकारी असलेल्या सत्यव्रत कुमार यांनी ईडीमध्ये दीर्घकाळ महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबईत जवळपास ११ वर्षे कार्यरत असताना त्यांनी देशातील अनेक चर्चित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणांचा तपास केला. सध्या त्यांची नियुक्ती सिलीगुडी येथे होती. (ED Director Satyavrat Kumar)



मुंबईत हाताळली अनेक गाजलेली प्रकरणे :


सत्यव्रत कुमार २०१३ मध्ये ईडीमध्ये सहसंचालक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर मुंबई युनिटचे प्रमुख म्हणून त्यांनी अनेक मोठ्या प्रकरणांची सूत्रे हाताळली. हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्याशी संबंधित सुमारे १२,५०० कोटी रुपयांच्या पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळ्याच्या तपासात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. (ED Director Satyavrat Kumar)


याशिवाय फरार उद्योगपती विजय मल्ल्या आणि त्याच्या किंगफिशर एअरलाइन्सशी संबंधित ९,२०० कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळा प्रकरणाचाही तपास त्यांच्या देखरेखीखाली झाला होता. (ED Director Satyavrat Kumar)



राजकीय व आर्थिक क्षेत्रातील मोठ्या तपासांची जबाबदारी :


मुंबईत कार्यरत असताना सत्यव्रत कुमार यांनी महाराष्ट्रातील अनेक चर्चित राजकीय नेत्यांशी संबंधित प्रकरणांमध्येही तपासाची धुरा सांभाळली. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेपासून ते माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारांच्या तपासात ते प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक होते. त्यामुळे ईडीच्या कारवाईंमध्ये त्यांचे नाव वारंवार चर्चेत राहिले होते. (ED Director Satyavrat Kumar)



इक्बाल मिर्ची, राणा कपूर आणि महादेव बेटिंग अॅप प्रकरणांचाही तपास :


सत्यव्रत कुमार यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित आर्थिक व्यवहारांवरही लक्ष केंद्रित केले होते. ड्रग्ज तस्कर इक्बाल मिर्ची याच्याशी संबंधित दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरण, येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यावरील मनी लॉन्डरिंगचा तपास तसेच देशभरात चर्चेत असलेल्या महादेव ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणाच्या चौकशीतही त्यांचा सहभाग होता. (ED Director Satyavrat Kumar)



२०२४ मध्ये कोलकात्यात बदली, २०२५ मध्ये मूळ सेवेत पुनर्नियुक्ती :


सप्टेंबर २०२४ मध्ये सत्यव्रत कुमार यांची ईडीचे विशेष संचालक म्हणून कोलकाता येथे बदली करण्यात आली होती. त्याआधी त्यांना ऑक्टोबर २०२६ पर्यंत ईडीमध्ये सेवा देण्यासाठी मुदतवाढही देण्यात आली होती. मात्र २०२५ मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने त्यांचा कार्यकाळ कमी करून त्यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजे केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात (CBIC) परत पाठवले होते. (ED Director Satyavrat Kumar)



स्वेच्छानिवृत्तीमागील कारणांबाबत उत्सुकता :


देशातील सर्वात संवेदनशील आणि चर्चित आर्थिक गुन्ह्यांच्या तपासाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्याने अचानक स्वेच्छानिवृत्ती स्वीकारल्याने प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, त्यांच्या निर्णयामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. (ED Director Satyavrat Kumar)

Comments
Add Comment

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Massive Fire : लखनौमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; विद्यार्थ्यांचा जीव वाचवण्यासाठी इमारतीतून थरारक उड्या

लखनौ (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीने मोठी खळबळ उडवून

West Bengal's Bold Budget : सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता २० टक्क्यांनी वाढला; विद्यार्थीनी आणि तरुणांसाठी मोठ्या घोषणा

कोलकाता : पश्चिम बंगालच्या अर्थव्यवस्थेला नवी गती देणारा आणि विविध घटकांना दिलासा देणारा राज्याचा अर्थसंकल्प

Monsoon havoc in Jharkhand : वीज पडून ८ जणांचा मृत्यू, क्रिकेट सामन्यादरम्यान एकाचा दुर्दैवी अंत

रांची (झारखंड) : झारखंडमध्ये नैऋत्य मान्सूनच्या आगमनासोबतच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. गेल्या २४

८.६ लाख मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन तीन टँकर भारताकडे रवाना ऊर्जा पुरवठा सुरक्षेला मोठा दिलासा

नवी दिल्ली : भारताच्या सागरी आणि ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची घडामोड घडली आहे. भारतीय ध्वज असलेले तीन