Nashik : आज नाशिकसह 'या' जिल्ह्यांना वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’

'Yellow alert' : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात तापमानाचा पारा दीर्घकाळ ४० अंश सेल्सिअसच्या पुढे आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र उन्हाने होरपळला आहे. अशातच उत्तर महाराष्ट्रातील जळगावसह धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्यासाठी हवामान खात्याने आज शनिवासाठी वादळी पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.


हवामान खात्याने आता पुन्हा एकदा वादळी पावसाचा इशारा दिल्याने चिंता वाढली आहे. विशेषतः केळी, द्राक्ष, डाळिंब आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मोठी काळजी सतावत आहे. मागील काही महिन्यांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे अनेक भागांतील फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांनी मोठ्या आर्थिक अडचणींवर मात करत फळबागा पुन्हा उभ्या करण्याचा प्रयत्न सुरू केला असतानाच नव्या संकटाची चाहूल लागली आहे. जोरदार वाऱ्यामुळे केळीच्या बागांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.



दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यंदाच्या मॉन्सून हंगामाबाबत सुधारित अंदाज जाहीर करत देशात सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९० टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्यमानात तुटवडा राहण्याची शक्यता तब्बल ६० टक्के असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उलट सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता केवळ २ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.



विभागनिहाय पर्जन्यमानाच्या अंदाजानुसार ईशान्य भारतात सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात ९४ टक्क्यांपेक्षा कमी, तर वायव्य भारतात ९२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम, पाणीसाठे आणि शेती उत्पादनावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उत्तर महाराष्ट्रात पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासन आणि हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

Water hyacinth : पवई तलावातील जलपर्णी आता कायमची हद्दपार..

तलावाच्या विहार पथाचा विकास सी एस आर निधीतून.. मुंबई: मुंबई महापालिकेच्या पवई तलावात सांडपाण्याच्या

Eknath Shinde : ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है!

वर्धापनदिनी एकनाथ शिंदे यांचे 'ऑपरेशन टायगर'वरून सूचक विधान; तुडवण्याची भाषा करणाऱ्यांचे पाय जागेवर ठेवणार

Supreme Court : चालण्याचा हक्क हा मूलभूत अधिकार- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने एका ऐतिहासिक निर्णयात चालण्याचा हक्क हा संविधानातील मूलभूत अधिकार असल्याचे

Monsoon : राज्यात २५ जूननंतर मान्सून सक्रीय होणार, हवामान खात्याचा नवा अंदाज

मुंबई : देशभरात मान्सूनच्या प्रगतीने पुन्हा एकदा मोठी विश्रांती घेतल्याचे चित्र दिसत आहे. सलग तिसऱ्या वर्षी

NDA : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एनडीए दिसणार भक्कम

नवी दिल्ली : संसदेच्या आगामी पावसाळी अधिवेशनात एनडीएचे शक्ती संतुलन विरोधकांवर वरचढ ठरणार आहे. एनडीएचा आकडा २९८

Ban on Telegram : टेलिग्रामवरील बंदी २२ जूनपर्यंत कायम

नवी दिल्ली: इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म 'टेलिग्राम'ला दिल्ली उच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. केंद्र