Saturday, May 30, 2026

Thane Water Cut : ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी राहणार तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद; अनेक भागांवर होणार मोठा परिणाम

Thane Water Cut : ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी राहणार तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद; अनेक भागांवर होणार मोठा परिणाम

ठाणे : ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील पावसाळ्यापूर्वीची आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्याने ३ जून २०२६ रोजी तब्बल १२ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. (Thane Water Cut)

">महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे उदंचन केंद्र तसेच टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशनमध्ये विविध तांत्रिक कामे केली जाणार आहेत. यामध्ये कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर ऑईल फिल्ट्रेशन, विद्युत यंत्रणेची तपासणी आणि इतर देखभाल कामांचा समावेश आहे. पावसाळ्यात कोणताही तांत्रिक बिघाड होऊ नये आणि नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी ही कामे आवश्यक असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. (Thane Water Cut)

या कामांसाठी बुधवार, ३ जून रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाणे महानगरपालिThane केच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेसह एम. स्टेम (MIDC) प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्याचाही शटडाऊन घेण्यात येणार आहे. परिणामी शहरातील अनेक भागांमध्ये या कालावधीत पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. (Thane Water Cut)

या भागांमध्ये पाणीपुरवठा बंद :

शटडाऊनचा फटका खालील भागांतील नागरिकांना बसणार आहे –

- घोडबंदर रोड परिसर - लोकमान्यनगर - वर्तकनगर - साकेत - ऋतुपार्क - जेल परिसर - गांधीनगर - रुस्तमजी - सिद्धांचल - इंदिरानगर - रूपादेवी परिसर - श्रीनगर - समतानगर - सिद्धेश्वर - इटरनिटी जंक्शन परिसर - मुंब्रा - कळवा येथील काही भाग

या सर्व भागांमध्ये सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित राहणार आहे.

पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणी :

महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शटडाऊन संपल्यानंतरही पाणीपुरवठा व्यवस्था पूर्ववत होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे ४ आणि ५ जून रोजी काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. (Thane Water Cut)

नागरिकांना महापालिकेचे आवाहन :

पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी आगाऊ नियोजन करून आवश्यक तेवढा पाणीसाठा करून ठेवावा. तसेच पाण्याचा अपव्यय टाळून महापालिकेच्या देखभाल कामांना सहकार्य करावे, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वीच्या या कामांमुळे भविष्यातील पाणीपुरवठा अधिक सुरक्षित आणि अखंड ठेवण्यास मदत होणार असल्याचेही प्रशासनाने सांगितले आहे. (Thane Water Cut)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >