मुंबई : पावसाळ्यात मुंबई–मांडवा रो-रो सेवा (Mumbai - Mandwa Ro-Ro Service) कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावी यासाठी मांडवा बंदरातील गाळ काढण्याचे काम महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. बंदरात साचलेल्या सुमारे ६६ हजार घनमीटर गाळाच्या उपशासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत असून, त्यामुळे रो-रो आणि प्रवासी जलवाहतूक अधिक सुरक्षित व सुरळीत होणार आहे.
मुंबई : मुंबईतील पवई (Powai) परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. एका चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याला भूक लागल्याने ...
मेरीटाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून बंदरातील गाळ काढण्यात आलेला नव्हता. त्यामुळे बंदरातील पाण्याची खोली कमी होत चालली होती. विशेषतः ब्रेक वॉटर बंधाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने त्या भागात उच्च क्षमतेची ड्रेजिंग यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)
जयपूर : राजस्थानच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये आज (३० मे) निसर्गाचा भीतीदायक आणि आश्चर्यकारक अनुभव पाहायला मिळाला. चुरू आणि श्रीगंगानगर परिसरात ...
२६ मेपासून मान्सूनमुळे नियमित सागरी प्रवासी जलवाहतूक बंद राहणार असली तरी मुंबई–मांडवा रो-रो सेवा सुरूच राहणार आहे. त्यामुळे मुंबई आणि रायगड दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना पावसाळ्यातही अखंडित सेवा मिळणार आहे. (Mumbai - Mandwa Ro-Ro Service)