येवला : हवामानातील बदल आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसल्याने तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. येवला (Yeola) तालुक्यातील पारेगाव (Paregaon) येथे कांदा चाळीत साठवून ठेवलेला उन्हाळी कांदा मोठ्या प्रमाणात सडल्याची घटना समोर आली आहे. बाजारात योग्य भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे चार पैसे जास्तीचे मिळतील या आशेने कांदा साठवला होता, मात्र आता तोच कांदा कुजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले आहे.
अतिउष्णतेने कांदा शिजला; लागली बुरशी
पारेगाव येथील शरद रामभाऊ खिल्लारे या शेतकऱ्याचा अंदाजे १२५ ते १५० क्विंटल (एकूण पाच ट्रॉली) कांदा अतिउष्णतेमुळे पूर्णपणे सडला आहे. मे महिन्यातील तीव्र उष्णतेचा फटका चाळीतील साठवणुकीला बसला. कमालीच्या तापमानामुळे कांदा चाळीतच शिजून गेल्यासारखा झाला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात बुरशी तयार झाली आहे. हा सडलेला कांदा आता बाजारात विक्रीयोग्य राहिला नसल्यामुळे, अत्यंत जड अंतःकरणाने शेतकऱ्यांवर हा कांदा उकिरड्यावर फेकून देण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. (Loss of 150 quintals of onion)
Nashik Crime News : गोशाळेला मिळालेल्या अनुदानाचा खर्च योग्य झाल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी चक्क ४१ हजार रुपयांची लाच मागितल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ...
कांद्याचे कोलमडलेले अर्थकारण
शेतकरी उन्हाळी म्हणजेच रब्बी कांदा मोठ्या आशेने चाळीमध्ये साठवून ठेवतात. पावसाळ्यात जसे भाव सापडतील, त्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने हा कांदा बाजारात विकला जातो. यातून मिळणाऱ्या भांडवलावरच शेतकऱ्यांचे पुढील पिकांचे आणि कुटुंबाचे आर्थिक नियोजन अवलंबून असते. मात्र, यावर्षी साठवणूक केल्यानंतर अवघ्या महिना-दीड महिन्यातच बदललेल्या हवामानाचा आणि वाढत्या पाऱ्याचा तीव्र फटका साठवणुकीतील कांद्याला बसला आहे. त्यामुळे पुढील पिकांच्या भांडवलाचा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. (Loss of 150 quintals of onion)
Nashik TCS case : नाशिकच्या TCS प्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. नाशिकच्या टीसीएस कंपनीतील (Nashik TCS) महिलांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धर्मांतराचा प्रयत्न आणि ...
शासकीय अनुदानाची वाढती मागणी
कांद्याला योग्य भाव मिळावा आणि निर्यातबंदी उठवावी या प्रमुख मागण्यांसाठी नुकतेच नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या वतीने मोठे आंदोलन करण्यात आले होते. कांद्याचा प्रश्न आधीच पेटलेला असताना, आता चाळीत साठवलेल्या कांद्याच्या झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकरी पुरता खचला आहे. या नैसर्गिक आपत्तीचा विचार करून शासनाने तातडीने पारेगाव व परिसरातील चाळींचे पंचनामे करावेत आणि साठवलेल्या कांद्याच्या नुकसानीसाठी थेट आर्थिक अनुदान द्यावे, अशी तीव्र मागणी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.






