पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू पिऊन मृत्यूकांडामागचं खरं कारण आता समोर आलं आहे. या प्रकरणात झालेल्या तपासात दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळेच नागरिकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. या दुर्घटनेमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी मुख्य आरोपी योगेश वानखेडेला अटक केली आहे. तर या प्रकरणातील दुसरा आरोपी आणि दारू अड्ड्याचा मालक कर्नलसिंह विरखा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथे एकूण १५ जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. यातील ११ जणांचा मृत्यू विषारी दारू प्यायल्याने झाला असल्याचं स्पष्ट झालं आहे, तर इतर चार जणांचा मृत्यू वेगवेगळ्या कारणांमुळे झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून अनेक धक्कादायक बाबी उघड होत आहेत.
पुणे : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri-Chinchwad) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील दापोडी-फुगेवाडी परिसरातील तब्बल ८ नागरिकांचा एकाच दिवशी संशयास्पद मृत्यू ...
पोलीस तपासात आरोपी योगेश वानखेडे हा दारू वितरणाचं काम करत असल्याचं समोर आलं आहे. मात्र दारू पोहोचवताना त्याने मध्येच गाडी थांबवून दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे. मिथेनॉल हे अत्यंत घातक रसायन मानलं जातं आणि त्याच्या सेवनामुळे अंधत्व, गंभीर शारीरिक परिणाम तसेच मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळेच या घटनेत अनेकांचा जीव गेल्याचं समोर येत आहे.
या प्रकरणी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई सुरू केली असून आतापर्यंत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. या कारवाईदरम्यान अनेक पुरावे आणि संशयित माहिती पोलिसांच्या हाती लागली असल्याचं सांगितलं जात आहे. पुढील तपास सुरू असून या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.
अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लोणी परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणीजवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात (Lake) बुडून तीन तरुण ...
आरोपी योगेश वानखेडेला अटक करण्यात आली आहे. तर कर्नलसिंह विरखा हा दारू गुत्त्याचा मालक असून तो सध्या फरार आहे. त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं असून लवकरच त्यालाही अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.