Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील दुर्दैवी घटना; तीन तरुण विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू!

अहिल्यानगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यातील लोणी परिसरातून अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. लोणीजवळील चंद्रपूर गावातील साठवण तलावात (Lake) बुडून तीन तरुण विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मित्रांसोबत फिरायला गेलेल्या तरुणांवर काळाने अचानक झडप घातल्याची भावना व्यक्त केली जात आहे. मृत झालेले तिन्ही विद्यार्थी स्थानिक ‘पायरेन्स आयबीएमए’ (IBMA) कॉलेजमध्ये एमबीएच्या (MBA) दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.


अभिषेक गंगाधर जाधव (वय २४, रा. सुरेगाव शिंगणापूर, ता. नेवासा), प्रवीण प्रभाकर रसाळ (वय २३, रा. रामनगर, छत्रपती संभाजीनगर) आणि महेश अशोक शिंदे (वय २६, रा. संत ज्ञानेश्वर नगर, छत्रपती संभाजीनगर) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. या तिघांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व विद्यार्थी मित्रांसोबत फिरण्यासाठी चंद्रपूर (Chandrapur) येथील साठवण तलाव परिसरात गेले होते. परिसरात फिरत असताना काही विद्यार्थी तलावाच्या पाण्यात उतरले. मात्र, पाण्याची खोली आणि पाण्याखाली असलेल्या खोल खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अभिषेक, प्रवीण आणि महेश हे तिघेही अचानक खोल पाण्यात जाऊ लागले. काही क्षणातच ते बुडू लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.


सोबत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून मदतीसाठी हाक मारली. विद्यार्थ्यांचा आवाज ऐकताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि रहिवासी तातडीने घटनास्थळी धावून आले. स्थानिकांनी पाण्यात उतरून तिघांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, तलावातील पाण्याची खोली आणि प्रवाह अधिक असल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण त्यांच्या हाती येण्यापूर्वीच या तिन्ही तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.



एकाच वेळी कॉलेजमधील (College) तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या मित्रांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कॉलेज परिसरातही शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे चंद्रपूर आणि लोणी परिसरातही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तिन्ही मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून लोणी पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Comments
Add Comment

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Narendra modi: पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली : रोजगारनिर्मिती, आर्थिक समृद्धी आणि सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारच्या

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य

Chief Minister Devendra Fadnavis : महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटी व उदैती फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई:

NASHIK : निदा खानच्या अर्जावर आता 'या' तारखेला पुढील सुनावणी

NASHIK : नाशिकमधील बहुचर्चित TCS प्रकरणातील निदा खान प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. नाशिकमधील अत्याचार, धर्मांतरण