Monsoon Alert : येत आहे १०० किमी वेगानं महाभयंकर संकट, मान्सून घालणार धुमाकूळ ; 'या' राज्यांना अलर्ट

मुंबई : देशासह राज्यात सध्या उष्णतेने अक्षरशः कहर केला असून अनेक शहरांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. प्रचंड उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मान्सून अजून भारताच्या विविध भागांमध्ये पूर्णपणे पसरलेला नसला तरी, अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे आणि मध्य व ईशान्य बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. तसेच हवामान विभागाने वायव्य भारतात तीव्र चक्रीवादळे, गारपीट आणि मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट दिला आहे.



पुढील ४८ तासांमध्ये देशातील हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून काही राज्यांमध्ये अतिवेगवान वादळ येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दिल्ली, हरियाणा आणि चंदीगड या भागांमध्ये ताशी १०० किलोमीटर वेगाने वादळ धडकण्याची शक्यता आहे. यासोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे.



हवामान खात्याने काही भागांसाठी रेड अलर्ट तर काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हरियाणासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल वातावरण तयार झाल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रातही काही भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे विदर्भात अजूनही

">उष्णतेची लाट कायम असून वाढत्या तापमानामुळे नागरिकांना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Tags
indiamaharashtrasummerred alertmansoonMaharastra MansoonEnvironment change
Comments
Add Comment

Devendra Fadnavis : बी.टी. सरांच्या निधनाने वैयक्तिक मार्गदर्शकाला मुकलो!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शोकसंवेदना मुंबई, माजी आमदार, शिक्षणतज्ञ आणि विविध सामाजिक प्रश्नांचे गाढे

Devendra Fadnavis : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद

'चेहरा पडताळणी पद्धती'द्वारेच प्रवेश; मुख्यमंत्र्यांपासून मंत्री आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह सर्व घटकांसाठी

Shrikant Shinde : दोन दिवस वाट पहा, सगळं स्पष्ट होईल!

 'ऑपरेशन टायगर'वर खासदार श्रीकांत शिंदे यांची सूचक प्रतिक्रिया मुंबई : उबाठा गटाचे ६ खासदार फुटल्यानंतर

Pratap Sarnaik : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आवाहन

मुंबई, : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींशी झालेल्या चर्चेत

Minister Dadaji Bhuse : शालेय शिक्षण विभाग आणि गुगल दरम्यान कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी करार

राज्यातील चार लाख शिक्षकांना मिळणार लाभ मुंबई : राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल

Jay Pawar : जय पवारांची मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राला भेट

मुंबई, महाराष्ट्रात पावसाच्या आगमनास होत असलेल्या विलंबाची सद्यस्थिती आणि त्याचा राज्यावर होणारा संभाव्य